भारताचे लोकप्रिय संगीतकार ए. आर. रहमान सध्या खूप चर्चेत आहे. पत्नी सायरा बानूबरोबर लग्नाच्या २९ वर्षानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल स्वतः रहमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. वकील वंदना शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नात्यातील भावनात्मक तणावानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे’. रहमान यांनी एक पोस्ट शेअर करत “लग्नानंतर ३० वर्ष पूर्ण करू अशी अपेक्षा होती. पण प्रत्येक गोष्टीचा एक अनोखा अंत असतो असं वाटत आहे”, असं लिहिलं आहे. अशातच बॅंडची बेसिस्ट मोहिनी डेनेदेखील वेगळं होण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता या कनेक्शनबद्दल चर्चा सुरु झाली आहे. ( a r rahman divorce)
रहमान व मोहिनी यांनी एकाच वेळी वेगळं होण्याची घोषणा केली त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरु झाली. याबद्दल आता सायरा यांच्या वकिलाने या प्रकरणावर भाष्य केले आहे. ‘रिपब्लिक टीव्ही’बरोबर बोलताना वकिलांनी रहमान व सायरा यांच्या घटस्फोटाबद्दल भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “या सगळ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. सायरा व रहमान यांनी स्वतः हा निर्णय घेतला आहे”.
“We had hoped to reach the grand thirty, but all things, it seems, carry an unseen end. Even the throne of God might tremble at the weight of broken hearts. Yet, in this shattering, we seek meaning, though the pieces may not find their place again. To our friends, thank you for…
— A.R.Rahman (@arrahman) November 19, 2024
दरम्यान रहमान यांनी अधिकृतरित्या घोषणा करत वेगळं होत असल्याचं सांगितलं आहे. हा निर्णय घेणं सायरा व रहमान यांच्यासाठी कठीण असल्याचंही वकिलांनी सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की, “जेव्हा एखादं लग्न यशस्वी होत नाही तेव्हा वेगळं होण्याचा निर्णय घेणं खूप कठीण असतं. लग्न मोडल्यानंतर कोणीही खुश नसतं. हा आनंद म्हणून कोणीही साजरा करत नाही. सायरा या लग्नामध्ये खूप चढ-उतारांना सामोरी गेली आहे”. मात्र त्यांच्या घटस्फोटाचा वकिलांनी अद्याप खुलासा केला नाही. त्यामुळे नक्की कारण हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
ए. आर. रहमान व सायरा बानो यांनी याआधी एका निवेदनाद्वारे विभक्त होण्याची घोषणा केली होती. दोघेही बराच वेळ या गोष्टीचा विचार करत होते. घाईघाईत कोणताही निर्णय झालेला नाही. सायरा यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितलं की, त्या आता हे नातं वाचवू शकत नाहीत आणि त्यामुळे अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.