शबाना आजमी या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांचा अभिनय व सौंदर्य यामुळे त्यांची नेहमी चर्चा होत असते. करियर सुरु असतानाच त्यांनी बॉलीवूडमधील प्रसिद्ध लेखक, कवी जावेद अख्तर यांच्याशी १९८४ साली लग्न केले. त्यांच्या लग्नामुळे मनोरंजन क्षेत्रात सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. याचे कारण म्हणजे जावेद यांचे शबाना यांच्याबरोबर दुसरे लग्न होते. त्यांचे आधी हनी इराणी यांच्याबरोबर लग्न झाले होते. तसेच त्यांना फरहान अख्तर व झोया अख्तर अशी दोन मुलंदेखील आहेत. (shabana azmi on hony irani)
पहिली पत्नी हनी यांना जावेद यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल ऐकून मोठा झटका लागला होता. आता शबाना यांनी एका मुलाखतीमध्ये याबद्दल भाष्य केले आहे. याआधीही शबाना यांनी हनी यांच्याबरोबरच्या नात्यावर भाष्य केले होते. आता पुन्हा एकदा त्याबद्दल व्यक्त झाल्या आहेत. त्यांनी संगीतले की, “जावेद यांच्याबरोबर माझे अफेअर सुरु होते तेव्हा हनी यांच्या मनात माझ्याबद्दल खूप मत्सर होता. मात्र त्यांनी खूप समजूतदारपणा दाखवला आणि माझ्याबद्दल व जावेद यांच्याबद्दल कधीही मुलांचे कान भरले नाहीत”.
अरबाज खानचा शो ‘द इविंसिबल्स’शी बोलताना शबाना यांनी सांगितले की, “जावेद यांनी हनी यांच्याबरोबर त्यांचे नाते पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न केले होते. ते आतादेखील तितकेच जवळ आहेत जितके ते पहिल्यांदा होते आतादेखील तितकेच जवळ आहेत. मला खूप आनंद होतो की माझं फरहान व झोयाबरोबरदेखील खूप चांगले संबंध आहेत. याचे मी सगळे श्रेय हनीला देते. जेव्हा मी व जावेदनी लग्न केले होते तेव्हा दोन्ही मुलं लहान होती. हनीसाठी दोन्ही मुलांना लांब करणे खूप सोपं होतं पण त्यांनी असं केलं नाही. त्यांनी मुलांना आमच्याबरोबर चांगले संबंध ठेवायला प्रोत्साहन दिले”.
शबाना यांचे हनीबरोबर आजही चांगले संबंध आहेत. त्याबद्दल त्या म्हणतात की, “हनी यांनी सगळ्यांनाच खूप छान सांभाळून घेतले. हनी यांना विश्वास आहे की त्यांना रात्री-आपरात्री केव्हाही गरज असेल तेव्हा त्या जावेद यांना फोन करुन बोलावू शकतात. या नात्यामध्ये काहीही समस्या येऊ नयेत याची आम्ही काळजी घेत आहोत”.
दरम्यान शबाना व जावेद हे प्रत्येक कार्यक्रमामध्ये एकत्रितपणे दिसून येतात. तसेच त्यांची दोन मुलं म्हणजे फरहान व झोयादेखील त्यांच्याबरोबर असतात. फरहान हा बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता, गायक व दिग्दर्शक आहे तर झोया ही चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका आहे.