सध्या प्रसिद्ध निर्माते संजय लीला भन्साळी यांची नवीन वेबसीरिज चांगलीच चर्चेत आली आहे. ‘हिरामंडी – द डायमंड बाजार’ ही नवीन सीरिज कालच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमध्ये मनोरंजन क्षेत्रातील मोठे कलाकार पाहायला मिळत आहेत. यामध्ये ऋचा चढ्ढा, सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, आदिती राव, संजीदा शेख, फरदीन खान, शेखर सुमन हे काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक कलाकारांनी कमबॅक केला आहे. त्यामुळे त्यांच्या अभिनयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (manisha koirala on relationship)
‘हिरामंडी’च्या निमित्ताने मनीषा कोइराला, फरदीन खान, शेखर सुमन, फरीदा जलाल यांनी खूप वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. यामध्ये मनीषा या मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली आहे. त्यामुळे तिला पाहून चाहत्यांना खूप आनंद झालेला दिसून येत आहे. यावेळी वेबसिरीजच्या प्रमोशनदरम्यान मनीषाने माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक खुलासे केले आहेत. यामध्ये तिने अफेअर्स व घटस्फोट यावर भाष्य करताना दिसली आहे.
आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम यावे अशी अपेक्षा आहे असे सांगताना ती म्हणाली की, “मला नेहमी वाटते की माझ्या आयुष्यात कोणीही पुरुष असेल, किंवा माझ्या आयुष्यात एखादा साथी असेल तर माझ्यासाठी ते खूप चांगले असेल. पण यासाठी मला प्रमाणिक व्हावं लागेल. त्याची वाट बघून मला माझा वेळ वाया घालवायचा नाही आहे. माझ्या नशिबात जर तो असेल तर चांगलेच आहे आणि नसेल तरीही ठीक आहे. मी सध्या माझ्या आयुष्यात जशी आहे तशी खुश आहे”.
पुढे ती म्हणाली की, “मला खूपच चांगले कुटुंब मिळाले आहे. माझ्यावर प्रेम करणारे आई वडील, भाऊ-बहीण व समजून घेणारे मित्र-मैत्रिणी मिळाले आहेत. तसेच माझे कामदेखील खूप चांगले सुरु आहे. मला फिरायला आवडतं. मी मानसिकरित्या, शारीरिकरित्या व भावनात्मकरित्या खूप खुश आहे. पण जर माझ्याकडे एखादा साथीदार असतं तर मला अजून आनंद झाला असता”.
मनीषाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर २०१० साली तिने नेपाळी बिजनेसमॅन सम्राट दहल बरोबर लग्न केले होते. मात्र काही वर्षातच दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. तसकह बॉलिवूडमध्येही तिचे नाव अनेक कलाकारांशी जोडले गेले होते. काही वर्षापूर्वीच तिने कर्करोगाशी सामना देखील केला आहे. पण त्यातून ती आता पूर्णपणे बरी झाली आहे.