अलीकडच्या काळात मनोरंजन सृष्टीमध्ये पापाराझीचे प्रस्त प्रचंड वाढलं आहे. सेलिब्रिटी कुठेही गेले की, त्यांच्यापाठोपाठ पापाराझी तिथे पोहोचतात. पापाराझी सेलिब्रिटींच्या मागेमागे करत त्यांना कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करत असतात. कलाकाराची प्रत्येक झलक टिपण्यासाठी अगदी उन्हातान्हात हे पापाराझी मेहनत घेत असतात. मात्र काही वेळेस पापाराझी सतत पाठलाग करत असल्याने सेलिब्रिटीसुद्धा अनेकदा वैतागतात.
कलाकारांनी पापाराझींणबद्दल राग, चीड व्यक्त केल्याच्या अनेक बातम्या प्रसार माध्यमांमधून व्हायरल होत असतात. अशातच रणबीर कपूरही पापाराझींवर प्रचंड भडकला होता आणि रागाच्या भरात त्याने पापाराझीचा मोबाइलही फेकून दिला होता. हिंदी रशच्या यूट्यूब चॅनलवर वरिंदर चावलाने एका मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं आहे.
यावेळी वरिंदर चावलाने असं म्हटलं की, “१०-१२ वर्षांपूर्वी माझा एक फोटोग्राफर रात्री फोटो काढण्यासाठी रणबीरच्या मागे लागला होता. रणबीर कुठेतरी जात होता. तेव्हा त्याने आपली कार थांबवली आणि फोटोग्राफरला “तो काय करतो आहे?, तो त्याच्या मागे का येत आहे? आणि त्याला विचारले की “तो कोणासाठी काम करतो”. असं विचारले. यानंतर रणबीरने त्याचा फोन घेतला आणि म्हणाला, “जा तुझ्या बॉसला माझ्याशी बोलायला सांग”. मग त्या फोटोग्राफरने मला दुसऱ्या नंबरवरून कॉल केला आणि घडलेला प्रसंग सांगितला.
आणखी वाचा – “त्या रात्री मी खूप रडलो आणि…” दत्तू मोरेने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “काम मिळत नसल्याचा त्रास…”
वरिंदर चावला पुढे असं म्हणाला की, “रणबीरने मला फोन करत घडलेल्या प्रकाराबद्दल फटकारले.” मग त्याने मला रात्री दोन, अडीच वाजताच्या सुमारास परत कॉल केला आणि सांगितले की तो घरी परतत आहे आणि फोटोग्राफर त्याचा फोन परत घेऊ शकतो. रणबीर तेव्हा रागावला होता. पण नंतर तो शांत झाला आणि त्याने त्याच्या गोपनीयतेचा आदर करण्यास सांगितले.
दरम्यान, गेल्यावर्षी जानेवारी २०२३ मध्ये ‘तू झुठी मैं मकर’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणबीरने सेल्फी घेत असलेल्या एका चाहत्याचा फोन हिसकावून फेकून दिला होता. अनेकांनी हे खोटे तसेच प्रमोशनची ट्रिक असल्याचे म्हटले होते.मात्र रणबीरच्या या कृतीवर अनेकांना त्याचा राग आला होता.