‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दररोज काहीतरी नवीन व मनोरंजक गोष्टी पाहायला मिळत आहेत. यामध्ये कधी कोणी आपापसात भांडत आहे तर कोणी एकमेकांना साथ देताना दिसत आहे. दरम्यान, अरमान मलिक व विशाल पांडे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या सगळ्या दरम्यान आता ‘बिग बॉस ओटीटी’च्या विजेत्याचीही घोषणा करण्यात आली आहे. पण ही घोषणा ऑफिशिअल नाही तर बिग बॉस स्पर्धक अरमान मलिकने केली आहे. (Bigg Boss OTT 3)
या शोच्या कालच्या भागात अरमान मलिक, रणवीर शौरी आणि नेझी एकमेकांशी बोलताना दिसले. यादरम्यान नेझीने सांगितले की, शिवानी व लव यांना कामासाठी कष्ट घ्यावे लागले नाही. या लोकांनी तंत्रज्ञानाचा फायदा घेतला आहे. तेव्हा अरमान म्हणाला की, “नवीन तंत्रज्ञानाबरोबर वाटचाल करा, नाहीतर मागे पडाल”. रणवीर आणि नेझीनेही याला सहमती दर्शवली. तेव्हा अरमान म्हणाला, “मी रणवीर भाईला या शोचा विजेता मानतो”. अरमानच्या या वक्तव्यावर पौलोमीनेही सहमती दर्शविली.
‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा एकदा मिड वीक इव्हिक्शन होणार असल्याची बातमी आहे. ‘बिग बॉस’च्या नवीनतम भागामध्ये, एलिमिनेशन प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये घरातील सदस्यांना नॉमिनेट करण्यास सांगण्यात आले होते. या कालावधीत सहा स्पर्धकांना बाहेर काढण्यासाठी नामांकन देण्यात आले. याचा अर्थ असा की दुसऱ्या आठवड्यात दोन स्पर्धकांना पुन्हा बाहेर काढले जाऊ शकते. यावेळी मुनिषा खटवानी, पौलोमी दास, चंद्रिका दीक्षित, विशाल पांडे, नेझी आणि शिवानी कुमारी यांना शोमधून बाहेर काढण्यासाठी नामांकित करण्यात आले आहे.
बिग बॉस OTT बद्दल अशीही बातमी आहे की, शोमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री होऊ शकते. मात्र, ‘बिग बॉस’मध्ये सतत एलिमिनेशन झाल्यानंतर आता स्पर्धकांना सतर्क राहून योग्य पद्धतीने खेळ खेळावा लागणार आहे. याशिवाय शोमध्ये टिकून राहण्यासाठी स्पर्धकांना नवीन रणनीती बनवावी लागणार आहे. मात्र, पुढे कोणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.