ओटीटी विश्वातील रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’चे दुसरे पर्व आता अंतिम टप्प्यात आले आहे. अशातच ग्रँड फिनालेला अवघे काही दिवस उरले असताना अभिनेत्री जिया शंकर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. बिगबॉसच्या घरात असताना जिया शंकर अनेक कारणांनी चर्चेत राहिलेली आहे, विशेष करून, जद हदीदला वडिलांचा दर्जा देण्यापासून ते अभिषेक मल्हानसोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांपासून. मात्र, शोमधून बाहेर पडण्याआधी जियाने एल्विश यादव सोबत गप्पा मारत असताना तिच्या वडिलांविषयी मोठा खुलासा केला आहे. ज्यात तिने सांगितलं, की ती गेल्या २० वर्षांपासून तिच्या वडिलांशी बोलली नाही. (Bigg Boss OTT 2 Jiya Shankar)
शोमध्ये जिया आणि एल्विश आणि जिया एकमेकांशी गार्डन एरियात बोलत होते. तेव्हा एल्विशने जियाला विचारलं की, तुला वडिलांची जास्त आठवण कधी येते. तेव्हा ती म्हणाली, “जेव्हा मी दुसऱ्यांची सुखी कुटुंब पाहते, तेव्हा मला माझ्या कुटुंबाची आठवण येते. मी याचे वर्णनही करू शकत नाही. लहानपणी जेव्हा मला कोणी काही बोलायचे, तेव्हा मी धावत वडिलांकडे जायचे. ते माझ्यासाठी खूप प्रोटेक्टिव्ह होते.”
पुढे एल्विश विचारतो, “तुझ्या वडिलांशी आता काही बोलणे होत नाही का?” यावर जिया म्हणाली, “नाही, आम्ही आता बोलत नाही. ते कुठे आहेत, काय करत आहे, कसे दिसत आहे, काय आवाज आहे, काहीच माहित नाही. वर्षांपासून आमचा एकमेकांशी कोणताच संपर्क नाही.” असं म्हणत जियाने तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केल्याचा खुलासा केला आहे. पुढे जिया म्हणते, “आता त्यांचे स्वतःचे कुटुंब आहे. त्यांना पत्नी आणि एक मुलगीही आहे. ते त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहे.”
यानंतरही एल्विश जियाला म्हणतो, की ते तुला अजूनही मिस करत आहे, हे माहिती आहे का ? त्यावर जिया म्हणते, “ते जर खरंच मला मिस करत असतील. तर त्यांनी किमान माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता. पण आता वेळ निघून गेली असून सर्वकाही बदललं आहे. त्यांना त्यांच्या आयुष्यात झालेल्या त्रासाचा त्यांनी एकट्याने सामना केला आहे.”
हे देखील वाचा – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून किती कमावतो जेठालाल?, दिलीप जोशी यांचं एका एपिसोडचं मानधन आहे तब्बल…
अभिनेत्री जिया शंकर ‘बिग बॉस ओटीटी’च्या आधी अनेक वेब सिरीजमध्ये दिसली असून तिने रितेश देशमुखसोबत ‘वेड’ या मराठी चित्रपटातही काम केले आहे. (Bigg Boss OTT 2 Jiya Shankar)