Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व २८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं. दरवर्षी हा शो १०० दिवसांचा असलेला पाहायला मिळाला मात्र यंदा हा शो ७० दिवसांचा असणार असल्याचं समोर आलं. यंदाच्या सीजनमध्ये एकूण १६ स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या चक्रव्ह्यूहात सहभाग घेतलेला पाहायला मिळाला. प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळवत सहा स्पर्धकांनी ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतलेली पाहायला मिळाली. आता या शेवटच्या क्षणी बाजी मारत कोणता स्पर्धक झगमगत्या ट्रॉफीवर नाव कोरणार याची साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. यंदाच्या या पर्वात एका स्पर्धकाने विशेष धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. हा स्पर्धक म्हणजेच निक्की तांबोळी.
‘बिग बॉस’ हिंदी सारख्या रिऍलिटी शोमधून येत निक्की तांबोळीने ‘बिग बॉस मराठी’मध्ये स्वतःच असं स्थान निर्माण केलं. या शोमध्ये निक्की चर्चेत असलेली पाहायला मिळाली. तसेच बाईईईईई हा काय प्रकार असे म्हणत निक्कीने साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तसेच निक्की प्रत्येक स्पर्धकाशी वाद घालताना दिसली. ‘बिग बॉस’च्या घरात असा एकही स्पर्धक नाही ज्याच्याशी निक्कीचा वाद झालेला पाहायला मिळाला नाही. आता निक्कीचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला असल्याचं समोर आलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरातून आता निक्कीने एक्झिट घेतली असल्याचा समोर आला असून ती घराबाहेर पडली आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, कोण ट्रॉफी घरी घेऊन जाणार?
अनेकांचा केलेला अपमान, अनेकदा घातलेले वाद, प्रत्येक गोष्टीवरुन केलेली भांडण या सगळ्यामुळे निक्कीला महाराष्ट्रातून अनेक ट्रोलिंगचा सामना करावा लागला. शिवाय अरबाज बरोबरच्या तिच्या नात्याची विशेष चर्चा रंगली आणि त्यामुळे ही निक्कीला ट्रोल व्हावं लागलं. मात्र, प्रत्येक ‘बिग बॉस’च्या टास्कमध्ये निक्कीने सगळ्यांच्या वरचढ ठरत ठरत प्रेक्षकांची मन जिंकली. निक्कीचाही सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.
सबंध महाराष्ट्रातून निक्कीला पाठिंबा मिळताना पाहायला मिळाला तर अनेकदा तिला तिच्या वागणुकीवरुन ट्रोलही करताना दिसले. कॉन्टेन्ट क्वीन निक्कीचा आता या ‘बिग बॉस’ सीझन ५ मधील प्रवास संपला असल्याचा पाहायला मिळत आहे.