Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील पाचवा आठवडा सुरु असून स्पर्धक मंडळी विशेष धुमाकूळ घालताना दिसत आहेत. मात्र गेल्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरातील समीकरणे काहीशी बदललेली दिसली. नुकताच ‘बिग बॉस’च्या घरात ‘पाताळ लोक’ टास्क पार पडला. या टास्कमध्ये ‘ए’ टीममध्ये निक्की-अभिजीत, घन:श्याम – पॅडी, वैभव-धनंजय या जोड्या होत्या. तर ‘बी’ टीममध्ये जान्हवी-सूरज, अरबाज-आर्या, अंकिता-वर्षा या जोड्या होत्या. पण या टास्कमधील पहिल्या फेरीमध्येच वाद झाले. ‘पाताळ लोक’ टास्कमधील पहिली फेरी खेळण्यासाठी ‘ए’ टीममधून वैभव-धनंजय गेले होते.
टास्कदरम्यान, अरबाजकडून बॉक्स तुटला म्हणून पहिल्या फेरीच्या संचालक असलेल्या निक्कीने ‘बी’ टीमने जमा केलेली नाणी ग्राह्य धरली नाहीत. त्यामुळे ‘ए’ टीमच्या संचालक जान्हवीनेही बॉक्स फोडला आणि त्यांची नाणी सुद्धा ग्राह्य धरली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. या फेरीत धनंजयने पाताळा लोकातून सर्वाधिक नाणी आणली होती. पण संचालकामुळे धनंजयची ही मेहनत फुकट गेल्याने त्याच्या आई व पत्नीने आपल्या भावना व्यक्त करत व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये धनंजयची पत्नी म्हणते की, “ए टीम आणि बी टीम होती. यांत ‘ए’ टीमकडून ते अगदी जीव तोडून खेळत होते. वैभव आणि त्यांची जोडी खेळत होती. अरबाजच्या हातून बॉक्स पडला आणि तुटला. इथे चूक दुसऱ्या टीमची नव्हती. त्यांची स्वतःची होती. त्यांच्या हातून डबा फुटला होता. निक्की म्हणाली, ती नाणी ग्राह्य धरली जाणार नाहीत. त्यांनी जीव तोडून २७ नाणी गोळा केली होती. पूर्ण त्यांनी त्यांचा खेळ दाखवला आणि तिथे आपल्याला त्यांचा खेळ दिसला आहे. त्यांनी हुशारीने खेळ खेळला”. पुढे धनंजयची आई म्हणाली, “त्याने बरोबर खेळ खेळला आहे. त्याने नाणी भरपूर गोळा केले होती. तो नाणी गोळा करुन वैभवकडे देत होता. खेळता खेळता अरबाजचा बॉक्स पडला आणि फुटला. आमचा धनंजय कसा खेळतोय हे जनतेने बघितलं आहे. आम्ही पण बघितलं आहे. जनतेला काय वाटतं त्यांनी सांगा”
त्यानंतर धनंजयची पत्नी म्हणाली, “यासंदर्भात तुम्ही कमेंटमध्ये कळवा. अॅक्शनला रिअॅक्शन आली पाहिजे. तुम्ही कमेंटमध्ये कोण बायस्ट खेळलं? कोण चांगलं खेळलं? कोणी १०० टक्के दिलं? हे आम्हाला कळवा. आम्हाला संचालक चुकीचे लाभले. एकाबाजूला निक्की आणि दुसऱ्याबाजूला जान्हवी. दोघी ‘ए’ टीमच्या निघाल्या, आमची ‘बी’ टीम बिचारी पडली. त्यामुळे त्यांची आधीची ‘बी’ टीम एकत्र आली तर नव्वल वाटून घ्यायचं नाही. कारण ते एकत्र येणारच आहेत”