‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत रंजक वळण आलेलं पाहायला मिळत आहे. मालिकेत एकामागोमाग एक येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत अचानक सात वर्षांचा लीप घेतल्याने मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. दरम्यान तब्बल सात वर्षांनी मालिकेत अर्जुन व अप्पी समोरासमोर आलेले पाहायला मिळत आहेत. तर त्यांचा मुलगा अमोलबाबत अद्याप अर्जुनला माहित नसतं. त्यामुळे अर्जुन व अमोलची भेट मालिकेत पाहायला सगळेच उत्सुक आहेत. (Appi Amchi Collector Promo)
अशातच मालिकेत अर्जुनची वहिनी अप्पी या घरात पुन्हा येऊ नये म्हणून कट रचते. ती अप्पीला घटस्फोटाचे पेपर्स पाठवते आणि अर्जुनने हे पेपर्स पाठवले असल्याचा खोटा आव आणते. ते पेपर्स पाहून अप्पीचा खूप मोठा गैरसमज होतो. यादरम्यान अर्जुनच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडते आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात येतं. अप्पीला जेव्हा हे कळत तेव्हा अप्पी तिच्या वडिलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये विचारपूस करायला येते.
त्यावेळी रुपाली दोघांनाही अडवते. तेव्हा अप्पीचे बाबा सांगतात, आपण यावर बोलूया. पण रुपाली दोघांनाही निघून जाण्यास सांगते. तेव्हा अप्पी, तिच्या बाबांना आपण आता इथून जाऊया असं सांगते. त्या आता ऐकायच्या मनस्थितीत नाहीत असंही सांगते. त्यानंतर रुपाली अर्जुन व आर्याच लग्न होणार असल्याचं सांगते. आणि तुम्ही दोघे घटस्फोट घेत आहात याची आठवण करून देते. त्यानंतर अप्पी व तिचे बाबा निघून जात असतात. तितक्यात तिथे अर्जुन व आर्या येतात.
अर्जुन आर्या व अर्पणाची एकमेकांना ओळख करून देते. त्यानंतर अपर्णा अर्जुनला सांगते की, बाबांची इच्छा असेल तर तू लग्न कर, मी घटस्फोटाच्या कागदावर सही करते असं सांगते. यावर अर्जुन, हो आता मागचं सगळं सोडून द्यायचं ठरवलं असल्याचं सांगतो. त्यानंतर अप्पी व तिचे बाबा निघून जातात. दोघेही जड अंतःकरणाने हे बोलत असतात हे प्रोमोमध्ये स्पष्ट दिसत आहे. आता मालिकेत नेमका कोणता ट्विस्ट येणार हे पाहणं रंजक ठरेल.