‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत आलेल्या रंजक वळणाने साऱ्या प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अमोलच्या हट्टापाई अर्जुन अमोल जवळच राहतो तर इकडे आर्यानं त्याच्यासाठी डेट प्लॅन केलेला असतो. आर्या त्याची आतुरतेने वाट पाहत असते तर इकडे अमोलने सांगितलेलं असतं की, तू जर निघून गेलास तर मी तुझ्याशी बोलणारच नाही. आधीच सात वर्षांचा दुरावा आणि त्यात पुन्हा बोलणार नाही असं सांगितल्यावर अर्जुनचा तिथून पाय निघत नाही. अर्जुन अप्पीला समजावण्याचा प्रयत्न करतो, मात्र अप्पी सुद्धा म्हणते की मी तुमच्या बाप बेटेमध्ये काहीच बोलणार नाही. आधीच सात वर्ष तुमच्यातला दुरावा खूप मोठा होता त्यामुळे आता मी काहीच बोलणार नाही. (Appi Amchi Collector)
तर इकडे अमोलही हट्टाला पेटलेला असतो की, मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आहे. तुम्ही इथून जाता कामा नये. यावर अर्जुन तिथंच थांबण्याचा निर्णय घेतो. तर त्यानंतर अमोल त्याच्या माँ-बाबा आणि अप्पी-अर्जुनमध्ये बॅडमिंटनची स्पर्धा लावतो आणि सांगतो की, ही स्पर्धा माझे माँ-बाबा जिंकणार आणि अमोलने सांगितल्याप्रमाणेच ही स्पर्धा माँ- बाबा जिंकतात. त्यामुळे अर्जुन अमोल खूपच खुश होतो. अमोल खूप आनंदात असतो आणि तर इकडे अर्जुनला आर्याचे दहा मिस कॉल आलेले असतात म्हणून तो आर्याला फोन लावतो. अर्जुन आर्याशी बोलायला जातो तितक्यातच अमोलला चक्कर येते म्हणून तो फोन चालूच ठेवतो आणि अमोल कडे धावून येतो. त्यानंतर अमोलने हे नाटक केलेलं असतं. अमोलला घरात आणतात तेव्हा अमोलला बरं वाटू लागतं मात्र अप्पी आणि अर्जुनला काळजी वाटू लागते की, अमोलला अशी सतत चक्कर का येते. दुसऱ्या दिवशी सगळेजण खूप खुश असतात तेव्हा अर्जुन सांगतो की मला आता कामासाठी बाहेर जावं लागेल पण मी संध्याकाळी पुन्हा येतो.
तितक्यातच घरा बाहेर एक गाडी येते आणि जोर जोरात हॉर्न वाजवू लागते. त्या गाडीतून अर्जुनचे बाबा, भाऊ आणि वहिनी आणि आर्या व तिची आई उतरते आणि सगळेजण घरात येतात. त्यानंतर आर्याची आई अर्जुनला खूप काही बोलते आणि सांगते की माझी पोरगी रात्री एकटी तिकडे तुझी वाट बघत होती पण तू काही परत आला नाही आणि तुला इथे तुझ्या पहिल्या बायकोबरोबर राहायचं आहे. इतकंच होतं तर तू आश्वासन का दिलं?, आतापर्यंत तू तिला गृहीत धरत आलाच आहेस आणि आता तर हद्दच पार केलीस हे सगळं ऐकत असताना अर्जुन त्यांची माफी मागतो. मात्र त्या काहीच ऐकून घेत नाही आणि आर्याही अर्जुनला खूप काही बोलते. तितक्यात अर्जुनचा भाऊ म्हणतो की अर्जुनचा भाऊ म्हणतो की, सात वर्ष तुम्हाला याची आठवण आली नाही आणि डिओर्स पेपरही तुम्हीच पाठवले ना?, यावर अप्पी सगळ्यांना थांबवते आणि म्हणते की, डिओर्स पेपर मी पाठवले नाही आहेत.
घटस्फोटाचे पेपर मला अर्जुनकडून आलेले आहेत आणि ते मी सह्या करुन पाठवले आहेत. हे ऐकल्यावर अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन सांगतो की, मी काही घटस्फोटाचे कागद तुम्हाला पाठवले नाहीत. मी गेली सात वर्ष तुझी वाट पाहत आहे तर मी घटस्फोटाचे कागद तुला का पाठवू?. यावर दीपेश सांगतो की आम्ही स्वतः या सगळ्याचे साक्षीदार आहोत की तुमच्याकडून घटस्फोटाचे कागद आमच्याकडे आले. हे नक्की कोणी केलं असा विचार करत दोघांनाही धक्का बसतो. मालिकेच्या पुढील भागात हे पाहायला मिळणार आहे की, अर्जुनची वहिनी सांगते की, हे घटस्फोटाचे कागद मी पाठवले आहेत. सत्य समोर आल्यावर आता दोघं काय निर्णय घेणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.