झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेने नुकतीच सात वर्षांची लीप घेतल्याने मालिकेच्या कथानकाला एक वेगळेच वळण आले आहे. या नवीन कथानकात अप्पी व अर्जुन यांचा मुलगा अमोल याचीही एंट्रीही झाली आहे. त्यामुळे अप्पी व अमोलची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडत आहे.
७ मे रोजी या मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये अप्पी व अर्जुन यांची भेट होतानाचे पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये असं पहायला मिळत आहे की, अमोल व अप्पी फिरायला जातात तेव्हा अमोलची टोपी खाल पडते. ती आणायला अप्पी खाली येते. टोपी उचलल्यानंतर अप्पीचा तोल जातो आणि ती खाली पडणार तेव्हा अर्जुन तिला पकडतो व तिला आधार देतो. अशाप्रकारे अखेर ७ वर्षांनी अप्पी व अमोल एकमेकांसमोर आले आहेत. यानंतर अप्पी व अर्जुन यांच्यातील संवादात अमोलचा विषय निघतो. तेव्हा अप्पी अर्जुन व अमोलची भेट होऊन न देण्याविषयी त्याला सांगते.
अप्पी-अर्जुनच्या या संभाषणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये अप्पी अर्जुनला असं म्हणते की, “मी सात वर्ष तुला जे वचन दिलं होतं ते मी पाळलं आहे. त्यामुळे मी आता जे सांगेन ते तू कर. अमोलला भेटायचा किंवा त्याच्याविषयी माहिती काढण्याचा अजिबात प्रयत्न करु नकोस. अमोलच्या प्रश्नांना गेली सात वर्षे मी कशीबशी थोपवत आली आहे. मी काय केलं आहे हे माझं मला माहिती आणि आता तू जर त्याला भेटलास, त्याला सगळं सांगितलंस तर अमोलला त्याची आई त्याच्याशी आतापर्यंत खोटं बोलत होती असं वाटेल.”
यापुढे अप्पी अर्जुनला असं म्हणते की, “तुझ्याकडे बाबा, स्वप्नील सर, रुपाली ताई हे सगळे आहेत. पण माझ्याकडे फक्त माझा अमोल आहे.” यावर अर्जुन अप्पीला “म्हणजे मी आता अमोलला भेटायचं नाही का?” असं विचारतो. यावर अप्पी त्याला असं म्हणते की, “असं नाही. मी त्याला तुझ्यापासून कधीच तोडणार नाही. पण कधी भेटायचं हे मीए ठरवणार. कारण अटा काय चूक आणि काय बरोबर हे महत्त्वाचे नसून फक्त मी सांगते ते लक्षात ठेव.”
त्यामुळे आता अमोल व अर्जुनची भेट नक्की कधी होणार? अप्पी अमोल व अर्जुनची भेट कधी घडवून आणणार हे येत्या आगामी भागांत पाहायला मिळणार आहे. अप्पीच्या परवानगीशिवाय अमोल आपल्या लेकाला भेटू शकेल का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत.