लग्नानंतर स्त्रिया आपल्या नवऱ्यावर असणारं प्रेम आणि त्याच्या दिर्घायुष्यासाठी वटपौर्णिमा सण अगदी थाटामाटात साजर करतात. किंबहुना त्या या सणासाठी उत्सुक असतात. कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकरचीही लग्नानंतरची ही पहिलीच वटपौर्णिमा होती. यावेळी अगदी मराठमोळ्या अंदाजात ती नटली होती. अंकिताचा नवरा कुणालही छान तयार झाला होता. सासरी म्हणजेच माणगावमध्ये तिने वटपौर्णिमा साजरी केली. इतकंच काय तर अंकितासह तिच्या नवऱ्यानेही उपवास केला. वटपौर्णिमा साजरी करतानाचे काही फोटो अंकिताने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले. मात्र एका महिलेने अंकिताला वटपौर्णिमा साजरी करण्यावरुन प्रश्न विचारले. याला तिने अगदी सडेतोड उत्तर दिलं आहे. (Vat Purnima 2025)
महिला चाहतीला अंकिताचा वटपौर्णिमा साजरी करण्याचा निर्णय पटला नाही. ती म्हणाली, “या सगळ्या गोष्टीवर अंकिता तुझा खरंच विश्वास आहे का?. नटण्यासाठी आणि दाखवण्यासाठी हे सगळं ठिक आहे. वडाला फेऱ्या मारुन तोच पती सात जन्म मिळतो हे पटतं का तुला?. तुझे मी सगळ्या पोस्ट पाहते, व्हिडीओ पाहते. त्यामधून तुला ओळखते तेवढं तू हे सगळं करतेस?. आता असो… तुला किंवा इतरांना मला दुखवायचं नाही. खूप छान मेकअप आणि लूक”.
आणखी वाचा – पारंपरिक लूक, मराठमोळा साज अन्…; रेश्मा शिंदेची पहिली वटपौर्णिमा, साऊथ इंडियन पतीसह घेतले सात फेरे
अंकिताने यावर अगदी योग्य उत्तर दिलं. ती म्हणाली, “वटवृक्ष हिंदू धर्मात खूप पवित्र मानला जातो. मी हिंदू आहे. हे व्रत स्त्रिया आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्य आणि सुखी दाम्पत्य जीवनासाठी करतात. त्यासाठी मला हे आयुष्यभर करायला आवडेल. सात जन्माचं मला माहित नाही. पण हे व्रत सावित्रीच्या दृढ निश्चयाचं प्रतिक आहे. जिने आपल्या पतीचे प्राण यमदेवाकडून परत मिळवले होते. माझं माझ्या नवऱ्यासाठी असलेलं प्रेम आणि माझ्या परंपरांवर असलेलं प्रेम यासाठी मी हे आयुष्यभर करत राहीन. आमच्या लग्नासाठीही आमचा दृढ निश्चय कामी आला होता”.
आणखी वाचा – ‘ती’ परत आली! आई झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यातच अभिनेत्री कामावर परतली, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

अंकिताने अगदी शास्त्र व परंपरा सांगत योग्य शब्दांमध्ये चाहतीला उत्तर दिलं. बऱ्याचदा २१व्या शतकात महिला वावरत असताना आम्ही वटपौर्णिमा का करु? असा उलट प्रश्न करतात. पुन्हा तेच की, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र अंकिताने समस्त विवाहित स्त्रियांना सोप्या शब्दांत याचा अर्थ समजावून सांगितला. लग्नानंतरची तिची ही पहिली वटपौर्णिमा अगदी खास ठरली आहे.