‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सीझन खूप चर्चेत आहे. या शोच्या होस्टपासून ते स्पर्धकांपर्यंत सगळ्यांचीच चर्चा होत आहे. तिसऱ्या सीझनच्या पहिल्या वीकेंड वॉरमध्ये अनिल कपूरने घरातील सदस्यांना धक्कादायक पद्धतीने रिॲलिटी चेक दिला. आणि या दरम्यान आणखी एका सदस्यालाही शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. यावेळी ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केलेल्या तिघांचे आता ब्रेकअप झाले आहे. प्रसिद्ध YouTuber अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिक हिला ‘बिग बॉस OTT ३’ मधील वीकेंड वार एलिमिनेशन दरम्यान बाहेर काढण्यात आले आहे. (Bigg Boss Ott 3)
जेव्हा शोचा होस्ट अनिल कपूरने पायलला बाहेर काढण्याची घोषणा केली तेव्हा ती खूप उदास दिसत होती. मात्र, यादरम्यान पायलचा पती अरमान मलिकची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. खरं तर, पायल मुख्य दरवाजाकडे जात असताना अरमान हसला आणि म्हणाला “ठीक आहे”. अरमान म्हणाला की, पायल बाहेर पडल्याचा त्याला आनंद आहे, त्याला पायलने राहावे आणि लढावे अशी त्याची इच्छा होती पण ती गेली आहे त्यामुळे तो खुश आहे.
आणखी वाचा – अहिल्यादेवींचा राग अनावर, आदित्यला दिली मोठी शिक्षा, तर मोहनने दामिनीलाही काढलं घराबाहेर
Just Look at the Face of Payal Malik 😞
— Anuj Prajapati (@anujprajapati11) June 30, 2024
when Armaan Said that agar wo Chali bhi jati hai to koi dikkat nahi hai, Ghar pe 4 Bacche sambhal Legi 😧#ArmaanMalik #PayalMalik #KritikaMalik #BiggBossOTT3 #BBOTT3 #LuvKataria #VishalPandey #AnilKapoor #JioCinema pic.twitter.com/8PWkesAGXb
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अरमान मलिकने पायलला मिठी मारली आणि निरोप घेतला आणि म्हणाला, “काही हरकत नाही”. पत्नीला निरोप देताना त्याने संयम राखला. अरमानची दुसरी पत्नी कृतिका मलिकनेही पायलला मिठी मारली आणि म्हणाली, “तू बाहेरची परिस्थिती हाताळशील. आम्हीही लवकरच येत आहोत”. यावर पायलने उत्तर दिले, “लवकर येऊ नकोस, शेवटपर्यंत तुला टिकून राहायचे आहे”.
आणखी वाचा – त्रिनयना देवीने नेत्राला दिली नवीन शक्ती, विरोचकाला नवीन शक्तीबद्दल कळणार का?
अरमान मलिक, पायल मलिक, शिवानी कुमारी, विशाल पांडे, दीपिक चौरसिया, सना सुलतान व लवकेश कटारिया ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या वीकेंड का वार मध्ये नामांकित झाले होते. अशा स्थितीत पायल मलिकला कमी मते मिळाल्याने शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र याच दरम्यान अनिल कपूरने पती अरमानला पहिल्या पत्नीला काढून टाकण्याबाबत प्रश्न केला. ज्यावर अरमान मलिक, “हे चांगले आहे. ती गेली तरी काही अडचण नाही, ती घरात चार मुलांची काळजी घेईल”.