सोशल मीडियासह सध्या सर्व माध्यमांमध्ये मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटबरोबर बोहल्यावर चढणार आहे. त्यामुळे लग्नाआधी अंबानी कुटुंबाने त्यांच्या गावी जामनगरमध्ये प्री-वेडिंग फंक्शन आयोजित केले आहेत. या भव्य कार्यक्रमाला बॉलिवूड, हॉलिवूडसह राजकीय, कला, उद्योग व काही सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मंडळीही हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या शाही कार्यक्रमाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलं आहे.
पण तुम्हाला माहीत आहे का, ज्यांच्या लग्नाची एवढी चर्चा सुरु आहे, त्या अनंत अंबानीने एकेकाळी कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. ‘आज तक’ला दिलेल्या एका मुलाखतीत अनंत अंबानीला त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अनंत अंबानीने “मी कधीही लग्न करणार नाही, असे मी आधीच ठरवले होते” असं उत्तर दिलं होतं. पण अनंत आंबानीने त्यांच्या उत्तरामागे अतिशय तर्कशुद्ध कारण सांगितले. इतकेच नाही तर भावी पत्नी राधिकासंबंधित काही खास गोष्टीही शेअर केल्या.
अनंतला त्याच्या लग्नाबद्दल विचारले असता त्याने उत्तर देत असं म्हटलं की, “मी प्राणीप्रेमी आहे. माझ्या लहानपणापासून आजतागायत मी लहान-मोठ्या सर्व प्रकारच्या प्राण्यांचीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सेवा केली आहे. माझे प्राण्यांवरील प्रेम कधीही संपणार नाही. मला माझा सगळा वेळ या कामात घालवायचा होता. याबरोबबरच त्याला सर्व प्राण्यांची काळजी घ्यायची होती. आपले संपूर्ण आयुष्य प्राण्यांच्या सेवेत घालवायचे होते. माझ्या या कृतीमुळे मला कुणी समजून घेणार नाही, म्हणून मला कधीही लग्न करायचे नव्हते”.
आणखी वाचा – Meraj Zaidi Death : प्रसिद्ध लेखक मेराज जैदी यांचे निधन, वयाच्या ७६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
यापुढे त्याने भावी पत्नी राधिकाबद्दल त्याचे मत मांडताना असं म्हटलं की, “पण राधिका मर्चंटला भेटल्यानंतर मला ती अगदी माझ्यासारखीच भासली. याशिवाय प्रत्येक अडचणीत राधिका माझ्या पाठीशी उभी राहिली. जेव्हा मी एका आजाराशी झुंज देत होतो, तेव्हा राधिका आणि तिच्या कुटुंबाने मला पूर्ण साथ दिली. मी माझ्या आरोग्याशी संबंधित सर्व समस्यांचा सामना एकट्याने नाही तर राधिकाबरोबर केला आहे. तसेच माझ्या प्राणी प्रेमात तिचीही साथ आहे. तसेच मी प्राण्यांची सेवा करताना राधिका कायम माझ्याबरोबर असते”.