बॉलिवूडमधील सध्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये रणदीप हुड्डाचे नाव घेतले जाते. २००१ मध्ये मीरा नायरचा चित्रपट ‘मॉन्सून वेडिंग’मधून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. पण सुरुवातीला त्याला बराच संघर्ष करावा लागला. त्यानंतर तो ‘जन्नत २, ‘जिस्म २’, ‘कॉकटेल’, ‘किक’ , ‘बागी २’ या चित्रपटांमध्येही दिसून आला. २२ मार्च रोजी त्याचा ‘स्वातंत्र्य वीर सावकरकर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे. (Randeep hudda on politics)
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहे. त्याच्याबरोबर या चित्रपटात अभिनेत्री अंकिता लोखंडेही दिसणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी तो अनेक ठिकाणी भेट देत आहे. यावेळी त्याला राजकारणामध्ये प्रवेश करण्याबद्दल विचारण्यात आले. पण त्याने नाही असं उत्तर नाही. तो म्हणाला की, “सध्या अभिनय सोडण्याचा आणि राजकारणात प्रवेश करण्याची ही योग्य वेळ नाही. तसेच मी आता माझ्या अभिनयावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा विचार करत आहे”.
अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार रणदीप हरियाणातील रोहतकमधून भाजपासाठी उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुका लढवू शकतो. त्याबद्दल ‘पीटीआयबरोबर संवाद साधताना तो म्हणाला की, “राजकारण हे निर्माता आणि अभिनय यासारखेच महत्त्वाचे क्षेत्र आहे. मी माझ्या अभिनयाच्या बाबतीत खूप इमानदार आहे आणि मनापासून अभिनय करतो. जर मला राजकारणात सहभागी व्हायचे असेल तर मी ते काम पूर्ण वेळ करेन. मला एका वेळेला अनेक गोष्टी करता येत नाहीत. एका वेळी मी एकच गोष्ट करण्यास प्राधान्य देतो. एक अभिनेता म्हणून माझ्याकडे अनेक चित्रपट करण्यासाठी आहेत. याव्यतिरिक्त दिग्दर्शक म्हणूनही मी नवीन आहे आणि मला हे करण्यामध्ये अधिक मजा येत आहे”.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे तो दिग्दर्शक आहे. तसेच या चित्रपटामध्ये तो मुख्य भूमिकाही साकारत आहे. याचबरोबर सह-लेखक व सह-निर्माताही आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने मॉडेल असलेली त्याची प्रेयसी लीन लैश्रामबरोबर लग्न केले.