Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, किर्लोस्कर मेन्शनमध्ये खूप मोठं संकट आलेलं पाहायला मिळत आहे. अहिल्यादेवींची तब्येत अचानक बिघडल्याने सर्वजण काळजी व्यक्त करताना दिसतायत. दिवाळीच्या मोक्यावर अहिल्यादेवींची तब्येत बिघडली असल्याने आदित्य, श्रीकांत, प्रीतम या सगळ्यांनाच त्यांची खूप काळजी वाटत आहे. तर आदित्यला कामानिमित्त बाहेर जावं लागत असल्याने तो अहिल्यादेवींची जबाबदारी पारूवर सोपवून जातो. तर इकडे मोहनने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अहिल्यादेवींना थोड्या थोड्या वेळाने काहीतरी खायला द्या असा निरोप दामिनीकडे पाठवलेला असतो. मात्र, दामिनी याउलट डाव खेळत पारुला गुरुजींनी अहिल्यादेवींना निर्जळ उपवास करायला सांगितलं असल्याचं सांगते आणि हा उपवास नाही केला तर आदित्याच्या जीवाला धोका असल्याचेही ते सांगते.
हे ऐकल्यावर पारूचा दामिनीवर विश्वास बसतो. अहिल्यादेवींनी काही करुन हा उपवास करायला हवा असा निश्चय पारू करते आणि दामिनी सुद्धा पारूला या उपवासासाठी मदत करेल असं तिच्याकडून आश्वासन घेते. इतकंच नव्हे तर या उपवासाबद्दल इतर कोणालाही माहिती देता कामा नये असेही दामिनी पारूकडून वचन घेते. तर इकडे दामिनी पारू विरोधात प्रियाचे काम भरताना दिसतेय. प्रिया जेव्हा अहिल्यादेवींसाठी पेज घेऊन जाते तेव्हा पारू तिथे येते आणि प्रिया मॅडमना खोटं सांगत आबांचा फोन आला आहे असं सांगते. आणि त्यांना तिथून घालवून देते आणि पेज थंड झाली आहे असं अहिल्यादेवींना सांगून ती पेज घेऊन पुन्हा किचनमध्ये निघून जाते. त्यामुळे अहिल्यादेवी या उपाशीच राहतात.
त्यानंतर काही वेळानं अहिल्यादेवींच्या घशाला कोरड पडते त्या पाणी शोधण्याच्या दिशेने बाहेर पडत असतात तितक्यातच तिथे पारू येते अहिल्यादेवी खाली पडणार इतक्यातच पारू त्यांना सावरते आणि बेडवर बसवते. आता अहिल्यादेवी पारू कडे पाण्याची मागणी करतात पारू समोर एक मोठं आव्हानच असतं. तेव्हा पाणी आणते सांगून पारू बाहेर जाते. त्यानंतर मालिकेच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, प्रिया अहिल्यादेवींच्या रूममध्ये येते तेव्हा अहिल्या देवींची तब्येत अचानक खालावलेली पाहते. त्याच वेळेला तिथे दामिनी सुद्धा येते.
पारूही धावत येते तेव्हा दामिनी म्हणते की, ‘अहिल्यादेवींच्या खोलीत पाणी सुद्धा नाहीये. पारू तुझं लक्ष नाहीये का वहिनीवर. मगापासून त्या पाणी पाणी करत आहेत आणि अजून त्यांना पाणी सुद्धा आणून दिलेलं नाहीये. नक्की तुझं काय सुरु आहे’, हे ऐकल्यावर प्रियाचाही राग अनावर होतो. तर पारूला धक्का बसतो. आता अहिल्यादेवींच्या तब्येतीला पारू जबाबदार ठरणार का हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.