‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे अहिल्यादेवींचा संताप झालेला असतो. त्या त्यांच्या खोलीत असताना श्रीकांतशी बोलतात आणि म्हणतात की, आज मी पहिल्यांदा आदित्यवर हात उचलला. याआधी त्याने त्याच्यावर मला हात उचलायची कधी संधीच दिली नाही एवढी मोठी चूक करुन बसला की मला हे करणं भाग पडलं. जर त्यांनी ही गोष्ट माझ्यापासून इतके दिवस लपवली होती तर यासारख्या अजून किती गोष्टी असतील ज्या त्याने माझ्यापासून लपवून ठेवल्या आहेत. असा प्रश्न त्या श्रीकांतला विचारतात.यावर श्रीकांत काहीच बोलत नाहीत आणि ते अहिल्यादेवींना आधार देतात. अहिल्यादेवी पूर्णता कोलमडून गेलेल्या असतात तेव्हा त्या आदित्यच्या लहानपणीचा फोटो घेऊन बसलेल्या असतात. तर इकडे पारू, मारुती हे देखील विचारांमध्ये रडत रडत बसलेले असतात. (Paaru Serial Update)
तर आदित्य पूर्णता कोलमडलेला असतो त्या वेळेला प्रीतम तिथे येतो आणि प्रीतम या सगळ्याचा खापर तू एकट्यावर का घेतोय असं म्हणतो. मात्र आदित्य प्रीतमला म्हणतो की, यांत तुझी काही चूक नाही आहे हे सगळं माझ्यामुळेच झालं आणि त्यामुळेच आईने माझ्यावर आज पहिल्यांदा हात उचलला याचं मला फार वाईट वाटतं आहे. मी लायक असा मुलगाच नाही आहे त्यामुळेच आईला माझ्यावर हात उगारावा लागला. हे ऐकल्यावर प्रीतमलाही वाईट वाटतं तर आदित्यला खूप रडू येतं. त्यानंतर प्रीतमही बाहेर जाऊन रडू लागतो.तर दामिनीला इकडे घराबाहेर काढलेले असतं त्यामुळे ती घराबाहेर बसून कोणी तिला घरात घेते का याची वाट पाहते. तेव्हा ती दिशाला फोन करते तेव्हा दिशा तिला सर्वन्ट कॉटर मध्ये जाऊन रहा. उद्या आपण सगळे याचं काहीतरी बघू असं सांगते. दिशाला या घरावर राज्य करायचं असतं म्हणून ती आगीत तेल ओतण्यासाठी किर्लोस्कर बंगल्यातच राहायचा निर्णय घेते. दुसऱ्या दिवशी इकडे पारू देवाला नमस्कार करत हे संकट दूर कर असं सांगत असते त्याच वेळेला तिथे सावित्री आत्या येते.
सावित्री आत्या तिथे येऊन म्हणतात की, बंगल्यात कोणीच काल जेवलं नाही आहे आणि सगळ्यांनी प्रत्येकाला आपापल्या खोलीत कोंडून घेतले आहे हे ऐकल्यावर पारू सांगते की, इतकं मोठं सत्य समोर आल्यावर हे असं होणं साहजिकच होतं. यावर सावित्री म्हणते की, अजून एक सत्य सर्वांसमोर येणं बाकी आहे. तू आदित्य सरांना नवरा मानते हे सत्य अजून इतरांसमोर आले नाही. हेच तू काल का नाही सांगितलं. हे आणखी एक सत्य लगेच पचवता आलं असतं. हे ऐकल्यावर पारू शांत बसते आणि म्हणते की, माझी आता फक्त एकच इच्छा आहे की आदित्य सर आणि देवीआई यांनी एकमेकांशी पहिल्या सारखं बोलावं. या पलीकडे मला काहीही नको आणि मला तुम्हा सगळ्यांची सेवा करायची आहे. यावर सावित्री पारूला खूप काही सुनावतात.
त्यानंतर पारू असं म्हणते की, इतकंच जर असेल माझ्यामुळे जर या गोष्टी घडत असतील तर मी माझ्या गावी पुन्हा निघून जाते. मला इथे राहायचं नाही आहे. मला फक्त तुमची सेवा करायची होती म्हणून मला इथे राहायचं होतं पण आता माझ्यामुळेच एवढ्या गोष्टी टोकाला जाणार असतील तर मी इथे राहून तरी काय साध्य होणार असं ती म्हणते. आता मालिकेच्या पुढील भागात पारू खरंच मुंबई सोडून गावी जाणार का हे सगळं पाहणं रंजक ठरणार आहे.