‘पारू’ ही मालिका सुरु झाली तेव्हापासून ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेतील कथानकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेत एकामागोमाग एक येणारी रंजक वळण प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. सध्या मालिकेत आलेल्या एका मोठ्या रंजक वळणाने ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अवॉर्ड फंक्शन सोहळ्याला अहिल्यादेवींना ऍड शूटचं सत्य समजतं. त्यावेळी साऱ्यांना घाम फुटतो. (Paaru Serial Promo)
अवॉर्ड फंक्शनला अहिल्यादेवी काहीच न बोलता तडक घरी निघून येतात. घरी आल्यानंतर जेव्हा आदित्य त्यांच्यासमोर येतो तेव्हा त्यांचा राग अनावर होतो. अहिल्यादेवी आदित्यच्या सणसणीत कानाखाली लागवतात. आणि इतके दिवस हे सत्य का लपवलं असा सवाल करतात. यावर आदित्य हे सत्य मी सांगण्याचा प्रयत्न केला असं सांगतो. यावर अहिल्यादेवी मात्र काहीच ऐकून घेत नाहीत. त्या आदित्यला दोष देत आजपासून तुझा माझा संबंध संपला असं सांगतात. हे ऐकून आदित्य पूर्णपणे कोलमडतो. तर पारूचीही त्या कानउघडणी करतात.
एक सत्य लपवल्याने संपूर्ण कुटुंबाला याचा त्रास सहन करावा लागतो. अशातच झी मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक प्रोमो व्हायरल होतं आहे. या प्रोमोमध्ये संपूर्ण कुटुंब कोलमडलेलं पहायला मिळत आहे. अहिल्यादेवी त्यांच्या खोलीत शांत बसून आहेत. तर श्रीकांत त्यांची समजूत काढताना दिसत आहे. तर इकडे आदित्य रडून रडून पूर्णतः कोसळला आहे. तसेच पारू, मारुती यांचाही डोळ्याला डोळा नसून ते देखील विचारात गाढ बुडालेले दिसत आहेत. तर प्रीतमलाही सगळ्याचा पश्चाताप होतं आहे. भर रात्री न थोपवणाऱ्या पावसात हे आलेलं वादळ तो काळ पुढे लोटताना दिसत आहे.
आणखी वाचा – शिवाच्या वागण्याचा आशूला त्रास, हात उचलताच रामभाऊंनी रोखलं अन्…; नात्याला वेगळंच वळण
समोर आलेला हा मन हेलावून टाकणारा प्रोमो साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. आता मालिकेत आलेलं हे वादळ केव्हा शांत होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.