झी मराठी वाहिनीवरील सध्या सर्वच मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहेत. यापैकी ‘शिवा’ ही मालिकाही सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतील शिवा व आशू यांची केमिस्ट्री चाहत्यांना विशेष आवडत असून त्यांच्यावर चाहत्यांचे विशेष प्रेम असल्याचे दिसून येत आहे. नुकतच मालिकेत दिव्या पळून गेल्याने आता आशुबरोबर शिवाचे लग्न होत असल्याचा ट्विस्ट पाहायला मिळाला. यामुळे शिवा व आशू यांच्या मैत्रीत दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाला आशूबरोबर लग्न करायचे होते, मात्र आशूला हे लग्न करायचे नव्हते.
मात्र आता दोघांचेही लग्न झाले असून त्यांनी त्यांच्या संसाराला सुरुवात केली आहे. आशुबरोबर लग्न झाल्यानंतर शिवाचं आयुष्य पूर्णतः बदललं. हे लग्न शिवा व राम भाऊ सोडून कोणालाच मान्य नसलेलं पाहायला मिळालं. आशुनेही शिवाला बायकोचा दर्जा दिला नाही. त्यामुळे शिवासाठी सासरी वावरणं फार कठीण होऊन बसलं आहे. रामभाऊंची शिवाला मिळालेली साथ या एका गोष्टीवरचं ती या घरात तग धरुन आहे. अशातच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे.
या नवीन प्रोमोमध्ये लग्नाचा गोंधळ झाल्यानंतर आशूला शिवाला उचलून घ्यायला सांगितले जाते. मात्र आशू याला नकार देतो. त्यानंतर रामभाऊ त्याला ही प्रथा असते. त्यामुळे तुला उचलून घ्यावंच लागेल असं म्हणतात. तर पंज्यादेखील त्याला तू शिवाला उचलून घेतलं नाहीस तर शिवा तुला उचलेल असं म्हणतात. त्यानंतर शिवा आशूला उचलतेदेखील. मात्र यामुळे आशू खूपच गोंधळून जातो आणि तो तिथून निघून थेट रुममध्ये निघून येतो. त्याच्या मागोमाग शिवा व रामभाऊही येतात.
आणखी वाचा – “तुला कोणी शिक्षा केली आहे का?”, प्रश्न विचारताच साईराजची बोलती बंद, म्हणाला “मी आगाऊपणा करतो तेव्हा…”
खोलीत येऊन आशू शिवाला बाहेर लोक होती व तिथे सर्वांसमोर गोंधळ नको म्हणून मी तुला काही बोललो नाही असं म्हणत शिवावर हात उचलत असताना रामभाऊ त्याला अडवतात आणि तेही त्याच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न करतात.
दरम्यान, यामुळे आता मालिकेत काय नवीन वळण येणार?, शिवा-आशू यांच्या नात्यात काय दुरावा येणार? हे आगामी भागांत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आगामी भागांसाठी मालिकेचे प्रेक्षक आतुर आहेत.