झी मराठी वहिनीवर नव्यानेच सुरु झालेली मालिका ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. १८ मार्चपासून ही मालिका झी मराठीवर प्रसारित होत असून मालिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. ‘पुन्हा कर्तव्य आहे’मध्ये अभिनेता अक्षय म्हात्रे आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर प्रमुख भूमिकेत आहेत. मात्र तुम्हाला माहीत आहे का अक्षयचे खऱ्या आयुष्यात लग्न झाले असून त्याची पत्नी ही हिंदी मालिकाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनेत्री श्रेणू पारीख ही अक्षयची पत्नी असून त्यांनी गेल्यावर्षीच त्यांनी लग्नगाठ बांधली.
२१ डिसेबंर २०२३ रोजी हा लग्नसोहळा पार पडला होता. नुकतंच अभिनेत्याने झी मराठीच्या ‘होम मिनिस्टर’च्या एका खास भागात त्याच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं आहे. ‘घर एक मंदिर’ या मालिकेत काम करताना २०२१ साली अक्षय व श्रेणू यांच्यात मैत्री झाली आणि पुढे त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. कोरोना काळात शूटिंग करत असताना त्यांच्यात प्रेम झालं. त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडली होती. या मालिकेच्या सेटवर प्रेमात पडल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
आणखी वाचा – बाप म्हणून कमी पडल्याची अर्जुनला जाणीव, अमोलला एकट्यालाच सोडल्यामुळे कोसळलं रडू, अप्पी विचारणार जाब
अक्षय-श्रेणू दोघांनीही सोशल मीडियावर त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील फोटो शेअर केले आहेत. शिवाय त्यांच्या लग्नसोहळ्यात टीव्ही विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते, या सोहळ्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत. अक्षय आणि श्रेणू दोघांनीही सोशल मीडियावर त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील फोटो शेअर केले आहेत. शिवाय त्यांच्या लग्नसोहळ्यात टीव्ही विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते, या सोहळ्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांच्या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही तुफान प्रतिसाद मिळतो.
आणखी वाचा – ‘बिग बॉस ओटीटी ३’मधून पहिल्याच आठवड्यात एक स्पर्धक घराबाहेर पडणार, कोणाची एक्झिट होणार?
दरम्यान, लोकांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अक्षयने याआधी ‘पिया अलबेला’, ‘ये दिल मांगे मोअर’ अशा विविध हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. तर त्याच्या पत्नीने ‘इश्कबाज’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ २’, ‘मैत्री’, ‘दिल बोले ओबेरॉय’, ‘घर एक मंदिर’, ‘ब्याह हमारी बहू का’ अशा अनेक मालिकांमध्ये मुख्य नायिका साकारली आहे. श्रेणूने आजवर अनेक आघाडींच्या मालिकांमध्ये मुख्य नायिकेची भूमिका साकारली असून अनेकदा टीआरपीच्या शर्यतीतही ती अव्वल ठरली आहे.