‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे पारूने सावित्री आत्याला सगळं काही सत्य सांगितलेलं असतं. पारूचं हे बदलतं विश्व पाहून सावित्री आत्यालाही काळजी वाटू लागते. ती तिला आराम करायला सांगून बंगल्यात निघून जाते. तर इकडे दामिनी किचनमध्ये आलेली असते आणि अस्थावस्था पडलेली भांडी पाहून आरडाओरडा करु लागते आणि पारू व सावित्रीला आवाज देते. तितक्यात अहिल्यादेवी तिथे येतात आणि सांगतात की, कशाला तू आरडाओरडा करत आहेस. यावर दामिनी म्हणते की मला आपल्या किचनची ही अवस्था पाहत नाही आहे. सावित्री व पारूचं लक्षच नाही आहे. आता हे आपल्याला घाबरतही नाही आहेत. (paaru serial update)
हे ऐकून अहिल्यादेवी काहीच बोलत नाही तेव्हा दामिनी सावित्रीला ओरडू लागते तेव्हा सावित्री सांगते की, मी पारुला घरी सोडायला गेले होते. तिच्या हाताला भाजलं आहे त्यामुळे तिला काहीच काम करता येत नव्हतं. हे ऐकल्यावर अहिल्यादेवी तिथून निघून जातात सावित्री ते किचन आवरू लागते. तर दामिनी तिकडून निघून जाते त्यानंतर इकडे अहिल्यादेवी पारूच्या हाताला मलम लावताना दिसतात. भाजलेल्या हातांना त्या मलम लावत असतात तेव्हा पारु झोपलेली असते. तितक्यात मारुती व गनीसुद्धा येतो. अहिल्यादेवी काळजी घे असं सांगत तिथून निघून जातात. त्यानंतर सकाळी पारू तयार होऊन बंगल्यात जायला निघते तेव्हा मारुती म्हणतो अग आराम कर. तेव्हा पारू सांगते की, आता माझे हातसुद्धा बरे झाले आहेत.
तू रात्री माझ्या हाताला मलम लावलंस ना?, यावर गनी व मारुती हसायला लागतात आणि सांगतात की, मी नाही अहिल्यादेवी आलेल्या आणि त्यांनी तुझ्या हाताला मलम लावलं. हे ऐकल्यावर पारूला रडू येतं. पारू बंगल्यात जाते आणि थेट अहिल्या देवीच्या पायावर डोकं ठेवते आणि म्हणते की, साक्षात काल माझ्या घरी देव आला होता आणि मी झोपले होते. तुम्ही माझ्या हाताला मलम लावलं ही खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि पारूला रडू येतं. माझ्या दारात सवाशीण आली होती तरीसुद्धा मी तिला हळद-कुंकूसुद्धा लावलं नाही आणि तिला असंच पाठवून दिलं. हे ऐकल्यावर अहिल्यादेवी म्हणतात की, मी काल मालकीण नाही तर माणुसकीचा धर्म जपला आणि असं म्हणत तिथून जात हळदी-कुंकवाचं ताट घेऊन येतात आणि सांगतात की, तुझी मला हळद-कुंकू लावण्याची इच्छा आहे ना?, तर तू मला लाव. तिला त्या असेही म्हणतात की, हरीशबरोबर ऍडशूटसाठी लग्न झालं तेव्हापासून तुझ्यात थोडीशी समज आली आहे. हे ऐकल्यावर सगळेजण शांत बसतात त्यानंतर प्रीतम आदित्य हरीशला कोणी फसवलं याचा शोध घेत असतात. तेव्हा प्रीतमने सगळ्यांची एक मीटिंग ठेवलेली असते. त्या गडबडीत तो असतो. तेव्हा पारू त्याला नाश्ता करण्यासाठी सांगते. मात्र प्रीतम सांगतो की मी आता गडबडीत आहे मी त्या लोकांची मीटिंग ठेवली आहे. त्यामुळे मला आता काही जमणार नाही, असं म्हणून तो घाईघाईत निघून जातो.
आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, दिशा दामिनीला सांगते की, आदित्य हरीशची फसवणूक कोणी केली याचा शोध घेत आहे. उद्या तुझं नाव कळालं तर तुझी काही खैर नाही. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आदित्य समोर हे सगळं सत्य येणार का?, अहिल्यादेवींना हे सगळं सत्य समजणार तेव्हा काय होणार?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.