‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळतं आहे की, आदित्यला आराम न करता कुठेतरी बाहेर जायचं असतं त्यामुळे तो पारूला अट सांगतो की मला तू इथून कुठेतरी बाहेर घेऊन चल. यावर पारूदेखील ती अट मान्य करते आणि सांगते की, तुम्हाला आधी हा काढा प्यावा लागेल आणि असं म्हणत त्याला बाहेर जाऊ असं सांगते. चला तयार व्हा आपण जाऊया, असं म्हणत पारू किचनमध्ये जाते तितक्यात आदित्य तयार होऊन येतो. त्याच वेळेला इकडे अहिल्यादेवी नसताना अहिल्यादेवींची जागा एका दिवसासाठी दामिनी देवी किर्लोस्कर घेते. दामिनी अहिल्यादेवी सारखाच वेष करत सगळ्यांना ऑर्डर सोडायचं ठरवते. पहिल्यांदा ती पारूच्या नावानं आरडा ओरडा करत किचनमध्ये येते त्यावेळेला आदित्य तिथे लपून बसतो. (Paaru Serial Update)
तेव्हा दामिनी सांगते की, मी आज मी तुमची मालकीण आहे हे ऐकल्यावर पारू देखील मालकीण म्हणून दामिनीचा स्वीकार करते आणि सांगते की, काय ऑर्डर आहे ती तुम्ही आम्हाला सोडा. यावर पारूला ती बाजारात जाऊन ताज्या भाज्या घेऊन ये असं सांगते. पारूदेखील हो असं सांगते आणि पिशवी घेऊन बाहेर पडते. तर आदित्य पाठीमागून बाहेर आधीच पडलेला असतो. बाहेर जाता जाता त्याला गणी दिसतो आणि गणीने पारुला पाहिलेलं असतं त्यामुळे पारू लपते. तेव्हा आदित्यला गणी विचारतो, पारू कुठे गेली तेव्हा आदित्य सांगतो, की ती घरात गेली असेल. तेव्हा आदित्य खोटं कारण सांगून त्याला दुसरीकडे पाठवून देतो बाहेर पडत असताना त्यांना प्रीतम भेटतो.
प्रीतम त्यांना पाहून म्हणतो की तुम्ही दोघं लपून-छपून फिरायला जात आहात का?, यावर प्रीतम खूप खुश होतो कारण प्रीतम किर्लोस्कर सारखा आदित्य किलोस्करने वागावं असं प्रीतमला मनोमनी वाटत असतं. त्यामुळे तो त्यांना छत्री आणूनही देतो आणि त्यांना बाहेर जायला सांगतो. बाहेर गेल्यानंतर आदित्यला खूप वेगळं आणि खूप आनंदी वाटत असतं कारण तो असं या आधी कधीच फिरलेला नसतो. पारू त्याची काळजी घेत त्याला फिरवताना दिसते. तर इकडे अहिल्यादेवी किर्लोस्कर यांना आदित्यची काळजी वाटत असते. त्या आदित्यला सतत फोन करत असतात मात्र आदित्य त्यांचा फोन काही उचलत नाही त्यानंतर त्या श्रीकांतच्या सांगण्यावरुन प्रीतमलाही फोन करतात मात्र प्रीतम त्यांचा फोन उचलत नाही. तर इकडे आदित्य व पारू बाहेर एन्जॉय करत असतात तेव्हा आदित्य बाहेर आपण खायला नको ते चांगलं नसतं असं म्हणत नकार देतो. मात्र पारू सांगते बाहेर आल्यावर आपण बाहेरच खायला हवं असं म्हणत त्याला खायला देते. त्यानंतर इकडे अहिल्यादेवी न राहून दामिनीला फोन करतात तेव्हा दामिनी अहिल्यादेवींच्या वेशात दामिनी देवी किर्लोस्कर म्हणून वागत असते.
अहिल्यादेवींचा फोन येतात दामिनीला खूप भीती वाटते आणि ती त्यांच्या खुर्चीवरून उठून उभी राहते आणि सांगते की, बोला वहिनी काय झालं मी दामिनी देवी किर्लोस्कर असं म्हणत बरेचदा गोंधळते. तेव्हा अहिल्यादेवी तिला शांत होण्यास सांगतात आणि सांगतात की, ताबडतोब तू आधी आदित्यच्या खोलीत जा. त्यांनतर दामिनी आदित्यच्या खोलीत जाते मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, दामिनी अहिल्यादेवी किर्लोस्कर यांना फोन करुन सांगते की पारू आदित्यला घेऊन पळून गेली आहे. आपण सर्वांना, मीडियाला काय सांगणार की, मोलकरणी बरोबर आदित्य किलोस्कर पळून गेले आहेत का?, आणि यावरच प्रोमो कट होतो. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात पुढे काय घडणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.