‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, श्रीकांत व अहिल्यादेवींनी त्यांच्या गुरुजींना घरी बोलावलेलं असतं. आदित्यवर येणार संकट पाहून ते काळजीत असतात तेव्हा गुरुजी सांगतात की, आदित्यवर संकट येणारच होतं हे मी याआधी सुद्धा सांगितलं होतं. मात्र आदित्यची बायको त्याचं संरक्षण करत आहे. त्याचं सुरक्षा कवच म्हणून तिचा जन्म झाला आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. हे सगळं बोलत असताना दामिनी न विचारताच अहिल्यादेवींच्या रूममध्ये येते मात्र अहिल्यादेवी तेव्हा काहीच बोलत नाहीत. दामिनी हे सर्व ऐकते तेव्हा म्हणते की, गुरुजी तुम्ही पत्रिका पाहून सगळं काही सांगता मग आदित्यच्या होणाऱ्या बायकोचं नाव काय आहे हे प्लिज आम्हाला सांगा. यावर गुरुजी म्हणतात, पत्रिका पाहून मी सगळं सांगतो शिवाय व्यक्तीच्या राहणीमानावर देहबोलीवर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ठरवल्या जातात याचाही आम्ही अभ्यास केला आहे. (paaru Serial Update)
जर मी पत्रिका पाहून सगळं सांगितलं असतं तर आज चित्र बदललेलं असतं. मुली तू आज इथे या घरात नसतीस असंही ते म्हणतात. हे ऐकून दामिनी पुढे काहीच बोलत नाही. त्यानंतर गुरुजी निघून जातात तेव्हा सगळेजण खाली येतात. आदित्य ही रूममध्ये बसून कंटाळा आला म्हणून प्रीतमच्या मदतीने खाली येतो आणि म्हणतो की, आई मी उद्यापासून कामाला जायला लागतो. मला घरात बसून खूप कंटाळा आला आहे आणि खूप काम पेंडिंग आहे. त्यावर अहिल्यादेवी नकार देतात आणि सांगतात की, १०० कोटींचं जरी काम रखडलं असेल तरी तू घरीच राहायचं. आधी आपल्या आरोग्याची काळजी महत्त्वाची आहे काम नंतर. तर इकडे हरीश पारूजवळ त्यांच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलेला असतो पारूला न सांगता हरीशने पत्रिका बनवून घेतलेली असते म्हणून तो त्याची माफी मागतो. तितक्यात मारुती येतो आणि मारुती ती पत्रिका बघतो आणि म्हणतो चल आपण ही पत्रिका पहिली देवाकडे ठेवून ठेवूया आणि असं म्हणत ते सगळेजण अहिल्यादेवींच्या बंगल्यात येतात आणि मारुती सांगतो, मॅडम पारू आणि हरीशच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलो आहोत.
ही पहिलीच पत्रिका आहे जी आम्हाला तुम्हाला द्यायची आहे, अस म्हणतो. हे सांगितल्यावर दामिनी त्याला म्हणते, बिनडोक आहेस का?, पहिली पत्रिका ही देवासमोर ठेवतात. यावर मारुती म्हणतो की, आम्ही आमच्या देवासमोरच ही पहिली पत्रिका ठेवायला आलो आहोत. मात्र दामिनीला काहीच कळत नाही तर अहिल्यादेवी म्हणते हो चालेल दे तू पत्रिका असं म्हणत त्या पत्रिका घेतात आणि मारुतीला सांगतात उद्यापासून तू कामावर यायचं नाही उद्यापासून तू तुझ्या लेकीच्या लग्नाची तयारी सुरु कर. त्यानंतर अहिल्यादेवी वगैरे मीटिंगसाठी निघून जातात आणि दामिनी सांगते थांब पारू पत्रिका घेऊन आली आहेस तर तुला हळद-कुंकू लावते, असं म्हणून त्यांना थांबवून घेते. सगळेजण निघून गेले ते पाहताक्षणी दामिनी आणि दिशा मारुती व पारूचा खूप पाणउतारा करतात आणि त्यांना त्यांच्या लायकीत राहण्यास सांगतात. पत्रिकेत दामिनीचं नाव न लिहिल्याने ती खूप भडकते. किर्लोस्करांच्या पैशावर तुम्ही मजा मारत आहात पण यापुढे मी असं होऊ देणार नाही असेही दिशा सांगते.
हे सगळं ऐकून मारुती-पारू यांना खूपच वाईट वाटलेलं असतं आणि ते भरल्या डोळ्यांनी परत निघून जातात. आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळत आहे की, अहिल्यादेवी व श्रीकांत बोलत असतात, तेव्हा अहिल्यादेवी श्रीकांत समोर म्हणतात की कोण असेल आदित्यची ही बायको तिच्यामुळे आदित्य सुखरूप आहे. यावर श्रीकांत पटकन बोलून जातो.पारू. आता मालिकेच्या पुढील भागात अहिल्यादेवींना पारू आदित्यचं नातं मान्य असणार का?, हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.