‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, प्रीतम आणि आदित्य एकत्र असतात तेव्हा आदित्यला फॉरेनच्या एका कंपनीतून फोन येतो आणि त्यांच्या कंपनीबरोबर कोलॅब्रेशन करायचं असल्याचं ते सांगतात. हे ऐकून आदित्य खूपच खुश होतो आणि होकार कळवतो. त्यानंतर आदित्य प्रीतमला ही आनंदाची बातमी सांगतो आणि सांगतो की हे प्रोजेक्ट तू लीड करशील यावर प्रीतम म्हणतो की, आईला हे चालेल का?, तेव्हा आदित्य आणि प्रीतम दोघेही अहिल्यादेवींकडे जातात आणि अहिल्यादेवीना ही आनंदाची बातमी सांगतात. (Paaru Serial Update)
यावर अहिल्यादेवी ही प्रीतमला हा प्रोजेक्ट लीड करण्यास परवानगी देतात. त्यावेळेला अहिल्यादेवी सांगतात की, इंडियातले सगळ्यात बेस्ट मॉडेल या प्रोजेक्टसाठी तुम्ही घ्या. यावर आदित्य सांगतो नाही आई या प्रोजेक्टसाठी त्यांना आपली ब्रँड अँबेसेडर पारूच हवी आहे. यावर अहिल्यादेवी नकार देतात आणि सांगतात की, पारू या प्रोजेक्टमध्ये काम करणार नाही मग आपलं लाखोंचं, करोडोंच नुकसान झालं तरी मला काही फरक पडत नाही, कारण पारू ही एक सर्वसामान्य मुलगी आहे आणि तिच्यासाठी लग्नही एक भावना आहे. त्यामुळे तिच्या भावनांशी खेळलेलं मला बिलकुल चालणार नाही. यानंतर प्रीतम व आदित्य सांगतात की, आम्ही पारुला समजावतो त्यावर अहिल्यादेवी नकारच देतात. मात्र अहिल्यादेवींच्या लक्षात येतं की पारू समोर जर तिचा होणारा नवरा हरीश असेल तर कदाचित तिला त्याने तितकासा फरक पडणार नाही.
यावर आदित्य ही आयडिया चांगली असल्याचं सांगतो आणि हरीश आणि पारूला हे सगळं काही समजावून सांगतो. त्यानंतर इकडे पारू येते आणि सर्व काही तिच्या आत्याला सांगते तेव्हा तिची आत्या तिला लग्न म्हणजे नेमकं काय असतं खरं आणि खोटं लग्न यातला फरक समजावून सांगते. यावर पारूला लग्न म्हणजे नेमकं काय असतं, ते कसं होतं याची कल्पना येते आणि पारू खूपच खुश होते. त्यानंतर अहिल्यादेवीना त्या फॉरेनच्या कंपनीतील एका व्यक्तीचा फोन येतो तेव्हा ती व्यक्ती सांगते की, हे डील जर तुम्हाला मान्य असेल तर यात नंतर काहीच बदल होणार नाही आणि जर बदल झाला तर तुम्हाला खूप मोठा तोटा होऊ शकेल. यावर अहिल्यादेवी हा माझा शब्द आहे आणि हे डील पूर्ण होणारच आणि हे प्रोजेक्ट अगदी तुम्हाला हवं तसं आम्ही पूर्ण करूनच राहणार असा शब्द देतात. यानंतर त्या आदित्य आणि प्रीतमला कामाला लागायला सांगतात. त्यानंतर इकडे ही गोष्ट जेव्हा दामिनी दिशाला सांगते तेव्हा दिशाच्या पायाखालची जमीन सरकते. पारूला घेऊन अजून किती नाचणार आहेत, आता या वेळेला तरी त्यांना अद्दल यायलाच हवी त्याच्यामुळे हे प्रोजेक्ट व्हायलाच नको म्हणून दोघीही प्रयत्न करतात.
मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, या प्रोजेक्टसाठी हरीश जेव्हा नवरा मुलगा म्हणून तयार होतो तेव्हा दामिनी दिशाच्या सांगण्यावरून त्याच्या सरबतमध्ये काहीतरी मिक्स करते आणि त्यावर हरीशला चक्कर येऊन तो खाली पडतो. आता हरीशशिवाय हे प्रोजेक्ट पूर्ण होईल का?, हे सर्व पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.