‘ठरलं तर मग’ मालिकेत सायली व अर्जुन यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची तारीख जवळ आलेली असते. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपायला शेवटचे ४८ तास उरलेले असतात तेव्हा अर्जुन डबा विसरला म्हणून सायली अर्जुनसाठी टिफिन घेऊन ऑफिसला येते. मात्र तुम्ही बाहेरच खाल म्हणून मी टिफिन घेऊन आले आहे आणि शिवाय मला कॉन्टॅक्ट मॅरेजबद्दल बोलायचं होतं. आता पुढे काय करायचं असा प्रश्न सायली अर्जुनला विचारते. तेव्हा अर्जुन सांगतो की, आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये असं लिहिलं होतं की, एक वर्षानंतर ही केस सॉल्व्ह झाली नाही तर काय करायचा यावरही उपाय लिहिला होता. (Tharal Tar Mag Serial Update)
आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये एक क्लॉज असा आहे की, यापुढे जर असं काही करायचं असेल तर आपण सहमतीने हा निर्णय घेऊ शकतो. यावर दोघांनाही दिलासा मिळतो. तितक्यात गोरे मॅडम न विचारता आत येता. अर्जुनला फाईल ठेवताना बघताना त्यांना असं वाटतं की, हीच कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल असेल का असा गोरे मॅडम विचार करतात. तितक्यात तिथे चैतन्य येतो आणि म्हणतो की, अर्जुन मला तुला काहीतरी सांगायचे आहे. त्यावेळी गोरे मॅडमला पाहून तो शांत बसतो. अर्जुन गोरे मॅडमना बाहेर जायला सांगतो.
महिपतकडे फोन आहे आणि तो मधुभाऊंबद्दल काहीतरी सांगत होता असं चैतन्य अर्जुनला सांगतो. तर इकडे गोरे मॅडम प्रियाला फोन करून सांगतात की चैतन्य आज अर्जुनच्या ऑफिसमध्ये आला होता.त्यावेळी ताबडतोब प्रिया साक्षीला फोन करुन सांगते की चैतन्य अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेला होता. तुझं त्याच्याकडे लक्ष नाही आहे का?, हे ऐकल्यावर साक्षीला धक्का बसतो. साक्षीला कळत नाही की अर्जुन व चैतन्य पुन्हा एकत्र आले आहेत का?.
सायली व अर्जुन मधुभाऊंना भेटायला जेलमध्ये येतात आणि महीपतसुद्धा याच जेलमध्ये असून सांभाळून राहण्याचे त्यांना सांगतात. आपण पुढील भागात बघणार आहोत की, कल्पना सगळ्यांना आपण अर्जुन सायलीचं लग्नाच्या पहिल्या मॅरेज अनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन सरप्राईज द्यायचं ठरवते. या घराशी माझं नातं फक्त कॉन्ट्रॅक्टपुरतं असलं तरी कधीच खोटं नव्हतं, असं सायली अर्जुनला सांगते.