Meera Welankar Exit : मालिका विश्वातील कलाकार विशेषतः प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहतात. अशी अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांना त्यांच्या मालिकेतील भूमिकांमुळे विशेष लोकप्रियता मिळाली आहे. बरेचदा त्या कलाकारांना त्या पात्राच्याच नावाने ओळखले जाते. तर काहीवेळा जेव्हा ही कलाकार मंडळी त्यांना सोडून जातात तेव्हा मात्र अनेकांना वाईट वाटतं. मालिकाविश्वात झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. तर शिवाच्या भूमिकेत अभिनेत्री पूर्व कौशिकचा दबदबा पाहायला मिळत आहे. तर शाल्व किंजवडेकरची आशुही भूमिकाही रसिकांच्या मनात घर करून आहे. या दोन मुख्य पात्रांव्यतिरिक्त आणखी एक चर्चेत असणार पात्र म्हणजे सीताई.
‘शिवा’ मालिकेत सीताई ही भूमिका मीरा वेलणकर साकारताना दिसल्या. कठोर मात्र तितक्याच प्रेमळ असणाऱ्या सीताईंनी त्यांच्या स्वविचारी आणि स्वाभिमानी स्वभावाने रसिकांची मन जिंकली. मालिकेतील इतर पात्रांशीही त्यांचा वावर उत्तम होता. आशु आणि सीताई यांच्यातील आई-मुलाचा बॉण्ड खूप खास होता. आशुच्या पाठीशी त्या कायम उभ्या राहिल्या. सुरुवातीला त्यांनी शिवाचा प्रचंड द्वेष केला. मात्र, कालांतराने त्यांच्यातील आणि शिवामधील नातंही निवळलं. सीताई सगळ्यांशी कठोर वागताना दिसल्या मात्र आशुसाठी त्या नेहमीच प्रेमळ आई राहिल्या.
आणखी वाचा – वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ कोणाजवळच राहीना, आईविना लेकराचे रडून-रडून हाल, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर
मीरा यांनी याबाबतची पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “सिताई माझ्यासारखी नाही. पण ते म्हणतात ना की, तुम्ही त्या पात्रासारखे बनता. गेल्या दीड वर्षात असंच काहीसं घडलं आहे. त्यातील प्रत्येक क्षण मी माझ्या मनात साठवून ठेवला आहे. आता कदाचित मी नवीन प्रवास सुरु करेन. सिताईची मला खूप आठवण येईल. पण, मी नवीन संधी, नवीन पात्र, नवीन भूमिका आणि नवीन सुरुवात करण्याकडे उत्सुकेने बघत आहे. मी या सगळ्यासाठी खूप कृतज्ञ आहे”.
आणखी वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ताचा अपघात, गाडी चालवताना झोप लागली अन्…; अभिनेत्रीचं मोठं नुकसान
अशा या कठोर व प्रेमळ याचे संमिश्र असणाऱ्या सीताईंचा मालिकेतील प्रवास संपणार आहे. हो. सीताई म्हणजेच मीरा वेलणकर यांनी त्या मालिकेला निरोप देणार असल्याचं पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. सोशल मीडियावर त्यांनी याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मालिकेतील इतर कलाकारांना मिस करणार असल्याचंही म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टवर शाल्व किंजवडेकरने “सिताई तुझी आठवण येत आहे. आता जेवायला भेटूया”, असे लिहीत हार्ट इमोजी शेअर केला आहे. पूर्वा कौशिकने, “तुमची आठवण येत आहे”, असे म्हटले आहे. मानसी सुरेशने, “माझं तुझ्यावर प्रेम आहे”, असं म्हटलं आहे.