२१व्या शतकात जगत असताना माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटना दिवसागणिक वाढतच आहेत. अत्याचार, शारिरीक शोषण, जन्मदात्या आई-वडिलांचा छळ, खून अशा अनेक घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून तर अशी बरीच प्रकरणं समोर येतात. आता अशीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आईचं निधन झाल्यानंतर चांदीच्या बांगड्यांसाठी भांडणं करणारी भावंड आणि त्यांचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. आईचा मृतदेह स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कारासाठी आणण्यात आला. यावेळी दोन भावंडांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. यामागचं कारण होतं ते फक्त चांदीच्या बांगड्या. ज्या आईने जन्म दिला, प्रेमाने वाढवलं आज त्याच मुलांनी हा दिवस दाखवणं म्हणजे लज्जास्पद होतं. पुढे मुलांनी असं काही केलं की, गावातील लोकांनाही मध्यस्ती करावी लागली. (brothers fight at mothers funeral)
नक्की प्रकार काय?
जयपूरमध्ये लीला गावात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर गावातील मंडळी व नातेवाईक जमले. त्या महिलेच्या अंत्यसंस्काराचीही संपूर्ण तयारी झाली. तिची दोन मुलं, कुटुंब, गावकरी स्मशानभूमीकडे निघाले. अंत्यविधीसाठी लागणारी सगळी तयारी तिथे करण्यात आली होती. अग्नी देण्यासाठी लाकडांची रचना करण्यात आली. मात्र या दुःखद प्रसंगी काही भलतंच घडलं. मृत महिलेच्या दोन्ही मुलांनी वादाला सुरुवात केली. चांदीच्या बांगड्यांवरुन हा वाद सुरु झाला. त्यानंतर समोर आलेलं दृश्य लज्जास्पदच होतं.
आणखी वाचा – झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”
पाहा व्हिडीओ
#जयपुर #शाहपुरा के पास लीलो की ढाणी की घटना कलयुगी बेटे ने अपनी माता के अंतिम संस्कार में रोड अटकाए एवं खुद चिता पर लेट गया।
— Manish Basniwal (@ManishBasniwal) May 15, 2025
चांदी के कड़ों के बंटवारे को लेकर हुआ विवाद, बाद में लोगों की समझाइश से अंतिम संस्कार हुआ। pic.twitter.com/m6UZoCe9vf
मृत महिलेचा मुलगा स्वतःच्याच आईच्या चितेवर झोपला. काही केल्या तो चितेवरुन उठेना. त्याचा दुसरा भावही भांडू लागला. जन्मदाती आई गेल्यानंतर होणारं दुःख तर बाजूलाच पण त्यांची विकृती यामधून दिसून आली. आईच्या चितेवर झोपल्यानंतर गावकऱ्यांनी व कुटुंबातील इतर मंडळींनी मुलाला समजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळाने तो चितेवरुन उठला. त्यानंतर अंत्यसंस्काराची पुढील प्रक्रिया करण्यास सुरुवात झाली.
आणखी वाचा – दीपिका कक्करला गंभीर आजार, लवकरच मोठी शस्त्रक्रिया होणार, नवरा म्हणाला, “विकृतात…”
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर कायमची शांतपणे झोपणाऱ्या त्या आईला नक्की काय वाटलं असेल? याचीही कल्पना करणं कठीण होतं. आईला शांतपणे शेवटचा निरोप देण्याऐवजी दोन्ही भाऊ एकमेकांना शिवीगाळही करत होते. आईला चितेवर ठेवायला जाणार तोच मुलांनी पुन्हा राडा करायला सुरुवात केली. मात्र इतरांच्या मध्यस्तीने त्या मातेला अखेरचा निरोप देण्यात आला. या व्हिडीओनंतर अनेकजण संताप व्यक्त करत आहेत. अशी मुलं असण्यापेक्षा नसलेलीच बरी असं मत कमेंटद्वारे मांडत आहेत.





