tharala tar mag jyoti chandekar : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या ६९व्या वर्षी निधन झाले. अचानक निधनाची बातमी समोर आल्याने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. निधनाच्या आधी तीन-चार दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. आणि उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अडीच वर्षांपासून त्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत पूर्णा आजी ही भूमिका साकारत होत्या. त्यांच्या अचानक निधनाच्या समोर आलेल्या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टीही हळहळली. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथे अंत्यसंकार करण्यात आले. त्यांना शेवटचे पाहण्यासाठी अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.
पूर्णा आजीच्या निधनानंतर ‘ठरलं तर मग’ मालिकेतील जुई गडकरी, अमित भानुशाली, मोनिका दबडे, प्रियांका तेंडोलकर, शिल्पा नवलकर, प्राजक्ता दिघे या कलाकारांनी भावुक पोस्ट शेअर केल्या. मालिकेतील कलाकार, सहकलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांनीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ज्योती यांना श्रद्धांजली वाहिली. या यादीत ठरलं तर मगच्या एका कलाकाराचं नाव पाहायला मिळालं नाही, तो अभिनेता म्हणजे अर्जुनचा मित्र चैतन्य म्हणजेच अभिनेता चैतन्य सरदेशपांडे.
आणखी वाचा – टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता झाला बाबा, लग्नाच्या १३ वर्षांनी घरी आली लक्ष्मी, फोटो समोर

पूर्णा आजीच्या निधनानंतर चैतन्य का व्यक्त झाला नाही?, असा सवाल त्याच्या चाहत्यांसह अनेकांना पडला. याबाबत त्याच्या चाहत्यांनी त्याच्याकडे विचारपूसही केली. यावर अभिनेत्याने त्याच्या ब्रॉडकास्ट चॅनेलवर भावना व्यक्त केल्या. चैनत्यने भावना व्यक्त करत असं म्हटलं की, “तुमच्यापैकी अनेकांनी मला विचारलं की, माझ्या संवेदना, दुःखाबद्दल मी इन्स्टाग्रामवर काहीच का शेअर केलेलं नाही. मी त्या सगळ्यांना हे सांगू इच्छितो की, इन्स्टाग्राम हे माझ्यासाठी व्यक्त होण्याचं माध्यम नाही आहे”.
आणखी वाचा – जेजुरीत खंडोबाच राहायला येणार! ‘जय मल्हार’ फेम अभिनेत्याच जेजुरीत होणार हक्काचं घर, भूमिपुजनाचे फोटो समोर
त्याने पुढे म्हटलं, “माझ्या आठवणी, माझं दुःख आणि आपण गमावलेल्या व्यक्तीशी असलेलं माझं नातं हे खूप वैयक्तिक आहे. सोशल मीडियावर मी काहीच शेअर केलं नाही, शांत होतो याचा अर्थ असा नाही की मला काळजी नव्हती. याचा अर्थ असा आहे की, मी माझ्या भावना खाजगीत ठेवतो. मी त्या भावना, आठवणी माझ्या हृदयात कायम जपून ठेवतो त्या गोष्टी सोशल मीडियाच्या फिडवर मांडता येणार नाहीत”.





