tharala tar mag : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. ज्यामुळे मालिकेतील सायली आणि अर्जुनची जोडीही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेले तीन वर्ष प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. टीआरपीमध्ये या मालिकेने सर्व रेकॉर्ड मोडले. मालिकेमधील वेगवेगळी वळणे प्रेक्षकांना नेहमीच आवडतात. सध्या या मालिकेमध्ये अर्जुन सुभेदार सायली आणि प्रियाचा भूतकाळ शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
मालिकेत सध्या गेल्या काही दिवसांपासून अर्जुन आपल्या बायकोच्या म्हणजेच सायलीच्या आई-बाबांचा शोध घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. सायली ही रविराज किल्लेदार यांची मुलगी असल्याचं सत्य मधुभाऊंना माहिती असतं. पण हे सत्य उघड होऊ नये म्हणून नागराज मधुभाऊंवर हल्ला करतो, ज्यामुळे ते कोमात जातात. मात्र कोमात जाण्यापूर्वी ते अर्जुनला सायलीचे आई-बाबा जिवंत असल्याचा एक मोठा इशारा देतात.
आणखी वाचा – ‘आठ तासच काम करणार’ यामुळे चर्चेत आलेल्या दीपिका पदुकोणने अखेर भाष्य केलंच, म्हणाली, “विचित्र कारणास्तव…”
दरम्यान, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने नुकताच नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये अर्जुनला सायलीच्या आई-बाबांबद्दल चुकीची माहिती महीपत आणि नागराज देतात. ज्यामुळे अर्जुनला गैरसमज होतो. जे आई-बाबा प्रियाचे असतात, त्यांनाच अर्जुन सायलीचे आई-बाबा समजतो आणि सायलीला त्यांना भेटायला घेऊन जातो. पुढे प्रोमोमध्ये सायली तिच्या आई-बाबांना पाहून भावूक होते. पण एकीकडे प्रियाला तिच्या आई-बाबांचं खरं सत्य माहिती असल्यामुळे ती टेन्शनमध्ये येताना दिसते आणि म्हणते, “माझे आई-बाबा इथे… आता मी काय करणार?” असं म्हणताना ती दिसते.
आणखी वाचा – मित्राच्या श्रद्धांजलीच्या पोस्टनंतर अभिनेत्याचेही निधन, शस्त्रक्रियेदरम्यान हृदयविकाराचा झटका आला आणि…
आता मालिकेत सायली प्रियाच्या आई-बाबांना स्वतःचे आई-बाबा समजेल का? की सायलीसमोर सत्य आल्यानंतर ती नेमकं काय करेल? आणि प्रिया हे सत्य लपवण्यासाठी काय-काय करेल? हे पाहणं अगदी मनोरंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचा प्रोमोनुसार सायली आणि प्रियाच्या नातेवाईकांमध्ये पूर्ण गोंधळ निर्माण होणार आहे. जोपर्यंत मधु भाऊ शुद्धीवर येत नाही तोपर्यंत हा गुंता सुटणार नाही त्यामुळे मालिकेत काय काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल.





