बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी इतर धर्मातील मुलांसह लग्नगाठ बांधली आहे. विशेषतः कलाकार मंडळींनी एका धर्मातून दुसऱ्या धर्मात लग्न केल्यानंतर अनेकदा गदारोळ होतो. बऱ्याच वर्षांपूर्वी एका अभिनेत्रीबरोबरही असंच घडलं होतं. या अभिनेत्रीच्या विरोधात अनेक लोक गेले पण तिने आपले प्रेम सोडले नाही. ही अभिनेत्री म्हणजे तन्वी आझमी. तन्वी एक ब्राह्मण महाराष्ट्रीयन कुटुंबातील मुलगी आहे. बॉलिवूडमध्ये अनेक उत्तम भूमिका साकारत तन्वीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यामुळे तिला वेगळी ओळख मिळाली. तन्वीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. (Tanvi Azmi On Wedding)
‘इंडियन एक्स्प्रेस’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तन्वीने सांगितले की, बालपणात ती खूप शांत आणि आज्ञाधारक मुलगी होती पण सुरुवातीपासूनच तिच्या रक्तात बंडखोरी होती पण ती बंडखोरी तिने कधी बाहेर येऊ दिली नाही. मात्र, एक वेळ अशी आली की ती बंडखोरी बाहेर पडली. तन्वी पुढे म्हणाली, “लग्न झाल्यावर मी बंडखोर झाले. कारण तेव्हा खूप काही घडले होते. एका ब्राह्मण महाराष्ट्रीयन मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न केल्यामुळे मला संपूर्ण मुंबई भडकल्यासारखी वाटली आणि माझ्यासाठी हे जग संपले, तेव्हापासूनच बंड सुरु झाले आणि ते कधीच संपले नाही”.
तन्वीने कैफी आझमी यांचा मुलगा बाबा आझमी यांच्याशी लग्न केले होते. शबाना आझमी त्यांच्या वहिनी आहेत. कुटुंबात स्थायिक होण्याबाबत तन्वी म्हणाली, “अशा कुटुंबाचा एक भाग बनून खूप छान वाटतं, पण त्यांनी मला कधीच निराश केलं नाही. इतरांनी जे साध्य केले आहे ते मिळवण्याची मला गरज आहे असे मला त्यांनी कधीच वाटू दिले नाही. हा एक प्रवास आहे. जोपर्यंत मला चांगले काम मिळेल तोपर्यंत मी माझ्या प्रवासात आनंदी आहे. आव्हानात्मक काम असणाऱ्या गोष्टींवर माझा अधिक लक्ष व भर असेल. माझ्या कुटुंबातील या व्यक्तीने एवढं केलं आहे, हे केलं आहे, याकडे माझं लक्ष कधीच नसतं”.
तन्वी यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘दिल दोस्ती दिलामा’ या वेब सीरिजमध्ये ती दिसली आहे. ज्यामध्ये तिने आजीची भूमिका साकारली होती. ही मालिका Amazon Prime या ओटीटीवर रिलीज झाली आहे.