बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी हा गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या अभिनयाने बॉलिवूडवर राज्य करत आहेत. सुनील शेट्टी पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसला, तरी तो कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायमच चर्चेत राहत असतो. वयाच्या पन्नाशीतही त्याचा फिटनेस एखाद्या तरुण उमद्या कलाकाराला लाजवेल असा आहे. नुकताच १६ जून रोजी ‘फादर्स डे’ साजरा करण्यात आला. याच ‘फादर्स डे’च्या निमित्ताने सुनील शेट्टीने त्याच्या वडिलांची संघर्ष कहाणी संगीतली आहे.
सुनील शेट्टीचे वडिल ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये टेबल सफाई कामगार म्हणून काम केले होते. त्याच हॉटेलचा मालक सुनील शेट्टी झाला. त्याच्या वडिलांच्या या संघर्षाबद्दल सुनील शेट्टीने एका मुलाखतीत भाष्य केलं. अभिनेत्याने सांगितले की, ज्या ठिकाणी सुनील शेट्टीचे वडील काम करत होते, त्या तीन इमारती त्याच्या वडिलांनी विकत घेतल्या. कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टवर दिसलेला सुनील शेट्टीने फादर्स डेच्या निमित्ताने वडिलांच्या संघर्षांबद्दल सांगितले.
यावेळी सुनील शेट्टी असं म्हणाला की, “माझे वडील वयाच्या ९व्या वर्षी मुंबईला पळून आले. माझे आजोबा नव्हते, पण तीन काकू होत्या. वयाच्या ९व्या वर्षी वडिलांना दक्षिण भारतीय रेस्टॉरंटमध्ये नोकरी मिळाली. तेव्हा पप्पांचं पहिलं काम होतं टेबल साफ करणं. त्यांच्याकडे मोठे पद नव्हते. त्यामुळे त्यांना एका टेबलाभोवती चार फेऱ्या माराव्या लागल्या. एक टेबल चारवेळा साफ करावे लागायचे. तसेच त्यांच्याजवळ झोपण्यासाठी पलंग किंवा गादी नव्हती. त्यामुळे ते तांदळाच्या पोत्यावर झोपायचे”.
आणखी वाचा – अवघ्या २ दिवसांत सुरु होणार ‘बिग बॉस ओटीटी ३’, तिसऱ्या पर्वात ‘हे’ स्पर्धक होणार सहभागी, जाणून घ्या…
यापुढे सुनील शेट्टीने असं सांगितलं की, “माझे वडील खूप संघर्ष करत पुढे गेले. त्यांनी खूप प्रगती केली. वडिलांच्या मालकाने तीन इमारती विकत घेतल्या होत्या आणि वडिलांना त्या इमारतींचे व्यवस्थापन करण्यास सांगितले होते. त्यांतर मालक निवृत्त झाल्यावर माझ्या वडिलांनी त्या तिन्ही इमारती विकत घेतल्या आणि आता तो माझा परिवार आहे. इथूनच आमचा प्रवास सुरू झाला”.
दरम्यान, सुनील शेट्टीने आजवर अनेक चित्रपटांमधून भूमिका साकारल्या आहेत. एक काळ त्याने मनोरंजन सृष्टीवर राज्य केलं आहे. अशातच नुकताच यांनी डान्स दिवाने या डान्स रियालिटी शोचे परीक्षणदेखील केले आहे.