दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. तमिळ चित्रपटांचे दिग्दर्शक विक्रम सुगुमारन यांचं निधन झालं आहे. ते ४८ वर्षांचे होते. आज (२ जून) विक्रम चेन्नईला जाण्यासाठी बसने प्रवास करत होते. प्रवास करत असतानाच त्यांना बसमध्ये हृदय विकाराचा झटका आला. विक्रम यांच्या निधनाची बातमी कळताच कलाकार, संपूर्ण दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. निव्वळ चाळीशीमध्ये विक्रम यांना आपला जीव गमवावा लागला. यामुळे सर्वत्रच हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Vikram Sugumaran death)
विक्रम यांच्या कुटुंबियांबाबत तसेच निधनाबाबत इतर अधिक माहिती अद्यापही समोर आलेली नाही. मात्र प्रवास करत असतानाच त्यांना त्रास जाणवला. दरम्यान काही कळायच्या आतच विक्रम यांना मृत्यूने गाठलं. हा मोठा धक्का त्यांच्यासाठीही होता. काही उपचार करण्यापूर्वीच विक्रम यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कुटुंबियांनीही सध्या याबाबत कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही.
तमिळनाडूमधील रामनाथपुरम जिल्ह्यातील परमकुडी भागात राहणारे विक्रम यांची अनेक स्वप्न अपूर्णच राहिली. दिग्दर्शक बनायच्या हेतूनेच ते कायमचे चेन्नईला निघून गेले. इंडस्ट्रीत काम करत त्यांनी स्वतःचं नावंही कमावलं. मात्र बरंच काम करणं राहूनच गेलं. १९९९ ते २००० या काळात त्यांनी बरेच लघूपट केले. त्यांचे हे लघूपट प्रचंड गाजले. ‘पोलाधवन’ चित्रपटातून त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर अभिनेता म्हणून ‘कोडिवीरन’मध्ये त्यांनी केलेलं काम प्रचंड गाजलं.
आणखी वाचा – “मी कल्की अवतार पाहिलाय आणि…”, ममता कुलकर्णींचं मोठं विधान, म्हणाल्या, “माझं गोत्रही…”
२०१३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘माधा यानाइक कुटम’ चित्रपटाचं विक्रम यांनी दिग्दर्शन केलं. या चित्रपटामुळेच ते दिग्दर्शक म्हणून प्रकाशझोतात आले. त्यानंतर रावण कोट्टम, थेरम बोरम सारख्या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं. त्यांच्या चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटातील अनेक कलाकारांनी काम केलं. थेरम बोरम त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. विक्रम यांच्या जाण्याने त्यांच्या सहकलाकारांनाही मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाद्वारे विविध आठवणी शेअर करत कलाकारांनी विक्रम यांना श्रद्धांजली वाहिली.