झी मराठी वाहिनीवरील सध्या सर्वच मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहेत. यापैकी ‘शिवा’ ही मालिकाही सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतील शिवा व आशू यांची केमिस्ट्री चाहत्यांना विशेष आवडत असून त्यांच्यावर चाहत्यांचे विशेष प्रेम असल्याचे दिसून येत आहे. नुकतच मालिकेत दिव्या पळून गेल्याने आता आशुबरोबर शिवाचे लग्न होत असल्याचा ट्विस्ट पाहायला मिळाला.
यामुळे शिवा व आशू यांच्या मैत्रीत दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे. याचनिमित्ताने ‘शिवा’ मालिकेतील आशू व शिवा म्हणजेच अभिनेता शाल्व किंजवडेकर व अपूर्वा फडकेबरोबर खास संवाद साधला. यावेळी त्यांनी मालिकेतील कथानकाबद्दल बोलताना त्यांनी असं म्हटलं की, “मला आता शिवाबरोबर काहीही संबंध ठेवायचा नाही. माझं तिच्याबरोबरचं नातं आता संपलं आहे. पण भाऊंमुळे आता तिच्याबरोबर राहावं लागत आहे”.
यापुढे त्यांनी पडद्यामागील त्यांच्या खास बॉण्डबद्दल विचारण्यात आले. याबद्दल सांगताना पूर्वाने सांगताना असं म्हटलं की, “आमचं एकमेकांशी छान जुळून येत आहे. आम्ही एकमेकांना खूप त्रास देतो. एखाद्या नवीन गोष्टीत जुळवून घेताना वेळ लागतो. तेवढा वेळ आम्ही घेतला आणि आता आम्ही एकमेकांशी फारच छान वागत आहोत. आम्ही एकमेकांना घालून पाडूनही बोलत असतो. पण तेच आमच्या नात्यातलं गमक आहे”. यापुढे त्यांनी आमचं ऑफस्क्रीन जास्त पटत नसल्याचेही सांगितले.
दरम्यान, नुकतेच शिवाच्या पहिल्या वटपौर्णिमा पूजेसाठी रामभाऊ व पूर्ण परिवार पूजेसाठी जातात. शिवा आपल्या पूजेची सुरवात करत असताना काही गुंड आशूच्या बहिणीची छेड काढण्याचा प्रयत्न करतात. आशु त्यांच्याशी दोन हात करायला जातो. पण आशूवर वार होतो. तिकडे शिवा आशूच्या मदतीला येते. वटसावित्रीच्या दिवशी ही सावित्री आपल्या सत्यवानची रक्षा या गुंडांनापासून कशी करणार? हे पाहायला मिळणार आहे.