बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरट्टी वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. Securities And Exchange Board Of india (SEBI) ने अर्शद, पत्नी मारिया व एकूण ५७ जणांवर मोठी कारवाई केली आहे. एक ते पाच वर्षांपर्यंत या अर्शदसह या सगळ्या मंडळींना सिक्योरिटीज मार्केटमध्ये व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची फसवणूक प्रकरणात अर्शद व त्याच्या पत्नीचंही नाव समोर आलं होतं. यामध्ये ५७ जणांचाही मोठा हात होता. आता यासंदर्भातच मोठं पाऊल सेबीकडून उचलण्यात आलं. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय? हे सविस्तर जाणून घेऊया. (SEBI bans Arshad Warsi)
नक्की प्रकरण काय?
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची मोठी फसवणूक केल्याचा आरोप सेबीने अर्शद, मारिया व इतर ५७ जणांवर केला आहे. सोशल मीडियाद्वारे चुकीची माहित पसरवली. शेअर्सची किंमत वाढवून ते अधिक जास्त किंमतीत विकले. यामध्ये त्यांना स्वतःला अधिक फायदा झाला. सेबीच्या माहितीनुसार, अर्शदने ४१ लाख ७० हजार रुपये कमावले. तर त्याच्या पत्नीला ५० लाख ३५ हजार रुपये फायदा झाला. सगळ्या दोषींनी मिळून ५८.०१ कोटी रुपयांची गैर कमाई केली. आता १२ टक्के व्याजासह सेबीला ही रक्कम परत करावी लागणार आहे.
सेबीने काय कारवाई केली?
सेबीने प्रकरणात दोषी असलेल्यांवर योग्य ती कारवाई केली आहे. तसेच सगळ्यांना पाच लाख ते पाच कोटी पर्यंतचा दंड आकारला आहे. गौरव गुप्ता, मनीष मिश्रा, कुमार गुप्ता या संपूर्ण प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. तर अर्शद व त्याच्या पत्नीला या सगळ्या प्रकरणात खेचण्यात आलं. हे संपूर्ण प्रकरण साधना ब्रॉडकास्ट आणि शार्पलाइन ब्रॉडकास्ट सारख्या कंपनींचं नावंही यामध्ये जोडलं गेलं आहे.
आणखी वाचा – सावधान! महाराष्ट्रात करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, १२ जणांचा मृत्यू तर…; लस घेऊनही आजार का होतो?
शेअर बाजारात फसवणूक केल्याप्रकरणी अर्शद व त्याच्या पत्नीचं नाव समोर आलं. मात्र त्याने या संपूर्ण प्रकरणाबाबत सध्यातरी बोलणं टाळलं आहे. अर्शदचं बॉलिवूडमध्ये बरंच मोठं नाव आहे. त्याने आजवर चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपट तर त्याच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. आता सेबीच्या निर्णयानंतर तसेच दंड आकारल्यानंतर विविध चर्चा होत आहेत. यामुळे अर्शदच्या इंडस्ट्रीतील कामावर काही परिणाम होणार का? हे पाहावं लागेल.