‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत आलेल्या रंजक वळणामुळे ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत सागर व मुक्ताची प्रेमकहाणी सुरु होणार इतक्यात सावनी त्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकते. सावनी व कार्तिक मिळून मुक्ताला अडकवायचा प्रयत्न करतात. मुक्ता कार्तिकचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्नही करते मात्र तिचं बोलणं कुणीही ऐकून घेत नाही. तेव्हा सागरही काही बोलत नाही. मात्र सागर मुक्ताला निर्दोष सिद्ध करण्यासाठी पुरावे शोधू लागतो. (Preamachi Gosht Serial Promo)
कार्तिकने आरतीलाही फसवलेलं असतं. आणि धमकी देऊन मुक्ताविरोधात खोटी साक्ष द्यायला लावलेली असते. सागर चलाखीने कार्तिकचा फोन खाली पाडतो. आणि मी रिपेर करुन आणतो असं म्हणत घेऊन जातो. कार्तिकच्या फोनवरुन तो आरतीला मॅसेजकरुन बोलावून घेतो. आरती भेटल्यावर तो आरतीकडून खरं काय ते काढून घेतो. मात्र आरती काही सांगायला तयार नसते. त्यानंतर आरती तिथून निघून जाते. ती सागरला म्हणते की, तिच्या आईची तब्येत बरी नाहीये आणि तिच्याशिवाय तिचं कोणी नाही आहे.
तर इकडे मुक्ता सईला घेऊन दिल्लीला जात असते. मुक्ता सईचे व तिचे कपडे घेऊन येण्यासाठी घरी येते. तेव्हा इंद्रा कोणताही मागचा पुढचा विचार न करता मुक्ताचा पाणउतारा करते. आणि मुक्ताची बरोबरी सावनीबरोबर करते. मात्र मुक्ता इंद्राला अगदी योग्य उत्तर देत तिचं तोंड बंद करते. त्यांचं बोलणं कार्तिक चोरून ऐकत असतो. तर इकडे सावनी कार्तिकची कानउघडणी करते की, तू तुझा फोन सागरकडे देऊन खूप मोठी चूक केली आहेस. मुक्ताला निर्दोष सोडवण्यासाठी तो काहीही करू शकतो. हे ऐकून कार्तिक घाबरतो. तितक्यात तिथे आरती येते. आरतीला पाहून तर कार्तिकच्या पायाखालची जमीन सरकते.
कार्तिक आरतीला धमकी देऊन जायला सांगतो. आरती त्याच्या कृत्यांचा पाढा त्याच्यासमोर वाचते. तेव्हा कार्तिक घाबरतो आणि आरतीला मदत केल्याची जाणीव करुन देतो. कार्तिक व आरती यांच्यातील संभाषण सागर शूट करतो आणि कार्तिकविरोधात पुरावा म्हणून तो सर्वांसमोर सादर करतो. कार्तिकचा खरा चेहरा समोर आल्यानंतर तो सांगतो सागर मुक्ताला सांगतो की त्याचा तिच्यावर सुरुवातीपासूनच विश्वास होता, फक्त त्याला कार्तिकविरोधात भक्कम असा पुरावा मिळवायचा होता.