भारत-पाकिस्तानमध्ये सुरु असलेला तणाव आणि त्यासंदर्भातील नवनवीन माहिती प्रत्येक दिवशी समोर येते. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानाविरोधात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यातीलच एक निर्णय म्हणजे सिंधू पाणी करार रद्द करणं. सिंधूचं पाणी थांबवल्यानंतर सोशल मीडियावर तर तुफान चर्चा रंगल्या. भारताने पाकिस्तानला पाणी दिलं नाही तर काय होऊ शकतं?, तेथील लोकांना काय अडचणी येऊ शकतात? याबाबत अनेक हास्यास्पद मीम्स समोर आले. मात्र खरंच पाण्याविना पाकिस्तानची झालेली अवस्था तिथल्याच एका अभिनेत्रीने उघडकीस आणली आहे. त्यादरम्यानचा व्हिडीओही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. (Actress video on pakistan real situation)
अभिनेत्री हिना ख्वाजा बयतने पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू करार थांबवल्यानंतरचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तिने कराचीच्या विमानतळाची अवस्था सांगितली. तिथल्या वॉशरुममध्येही पाणी नसल्याचं उघडकीस आणलं. अभिनेत्री हिनाने म्हटलं की, “मी कराचीचा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभी आहे. पाकिस्तानने मिळवलेलं यश सेलिब्रेट करण्याचा हा आजचा दिवस आहे. पण मला इथे काही वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. विमानतळावर वॉशरुममध्येही पाणी नाही. लोकांना नमाज पठण करायचं आहे. मुलांना वॉशरुमला घेऊन जायचं आहे. पण इथे पाणीच नाही”.
आणखी वाचा – नणंदेकडून तितीक्षा तावडेला खास सरप्राइज, गिफ्ट पाहून भारावली अभिनेत्री, खास व्हिडीओ समोर
मशहूर पाकिस्तानी अभिनेत्री हिना ख्वाजा बेयत ने हाल ही में एक बयान में देश की हालत पर चिंता जताई।
— Anahat🇮🇳 (@AnahatSagar) May 29, 2025
उनका कहना है कि जब राष्ट्रीय गर्व के दिन भी कराची एयरपोर्ट जैसे अहम स्थानों पर वॉशरूम्स में पानी तक नहीं मिल रहा, तो फिर पाकिस्तान में 'फख़्र' का दावा किस बात का किया जा रहा है? pic.twitter.com/lfXYGhVEFx
“आपलं विमानतळ, इंस्टीट्युट, आपली सुव्यवस्था याची अशी परिस्थिती का झाली आहे?. आपल्याबरोबर हे सगळं काही घडत आहे असं मान्य करायला कोणीच तयार नाही. स्वतःची चुकी मान्यही करत नाहीत. हे सगळं सुधारण्याची आता गरज आहे. मोठ मोठे प्रोजेक्ट्स तयार होत आहेत. ट्रेनही तयार होत आहेत. पण विमानतळ, जुन्या सुविधांची झालेली अवस्था, बाथरुममध्येही पाणी नसणं खरंच लज्जास्पद आहे”.
आणखी वाचा – “शबाना व मी रस्त्यावर झोपायचो…”, जावेद अख्तर यांनी सांगितला ‘तो’ कठीण काळ, म्हणाले, “मुस्लिमांना…”
हिना यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तसेच पाकिस्तानमधील मुख्य विमानतळांपैकी एक कराची विमानतळावर असलेली अवस्था आता उघडपणे समोर आली आहे. ज्या देशाकडे पाणीही नाही ते काय लढाई करणार?, पाकिस्तानविरोधात त्यांच्या देशातील लोकच उभे आहेत, तुमच्या देशातील व्यवस्था आधी नीट करा नंतर भारत देशाला लढा द्या अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच हिनाचा हा व्हिडीओ भारतामध्येही वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. अगदी उघडपणे संपूर्ण परिस्थिती मांडल्यानंतरही पाकिस्तानला जाग येणार का? असं हिना यांचं म्हणणं आहे.