‘पारू’ मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, पारू आणि हरीश यांचं लग्न होणार असतं मात्र दिशा आणि दामिनी डाव आखत हरीशला तिथून गायब करतात. त्यामुळे आदित्यवर मोठं संकट ओढवलेलं असतं. तर परदेशी कंपनीच्या मालकीण असतात त्यांच असं म्हणणं असतं की, काही झालं तरी हे शूट व्हायला हवं. त्यावेळेला त्यांची सेक्रेटरी आदित्यला म्हणते की, काही झालं तरी हे शूट व्हायला हवं नाही तर तुमचं खूप मोठं नुकसान होईल आणि अहिल्यादेवींनी आम्हाला शब्द दिला आहे त्यांचा शब्द हा इंडस्ट्रीमध्ये प्रमाण मानला जातो नाहीतर त्यांच्या शब्दाला काहीच व्हॅल्यू राहणार नाही. हे ऐकल्यावर आदित्यला आणखीनच टेन्शन येतं. (Paaru Serial Update)
तेव्हा त्या परदेशी कंपनीच्या मालक आदित्यला तूच नवरा मुलगा म्हणून तयार हो असा सल्ला देतात. तुझी आणि पारूची जोडी शोभेल असंही त्या म्हणतात. यावर आदित्य नकार देतो तर प्रीतमला ही गोष्ट पटते. प्रीतम आदित्यला बाजूला घेऊन जातो आणि समजावून सांगतो. मात्र आदित्य काही केल्या हे असं आईच्या विरोधात जाऊन करायला तयार नसतो. तेव्हा प्रीतम सांगतो की, आईला तू फोन कर आणि सगळी परिस्थिती सांग. जेव्हा तो फोन लावतो तेव्हा त्या बिझी असतात म्हणून तो आत्याला फोन लावतो. तेव्हा कळतं की, अहिल्यादेवी एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये व्यस्त आहेत आणि त्यांना दोन तास कोणीही डिस्टर्ब करायचं नाही असा आदेश आलेला आहे. हे ऐकल्यावर आदित्यचं टेन्शन आणखी वाढतं. त्यानंतर काही केल्या आईचं नाव आणि किर्लोस्कर कंपनीची बदनामी होऊ नये यासाठी आदित्य स्वतः लग्नासाठी तयार होतो.
ते पाहून दामिनीच्या पायाखालची जमीन सरकते. दामिनी हे असं करणं चुकीचं आहे असं सांगते मात्र प्रीतम तिला शांत करतो आणि म्हणतो की तू यात लुडबुड करू नकोस. तर इकडे आदित्य समोर उभा असतो तेव्हा नवऱ्या मुलीला बोलवण्यात येत आणि हे शूट बारा देशांमध्ये लाईव्ह पाहायला मिळणार असतं. नवरी मुलगी येते तेव्हा ती आदित्यला समोर हरीशच्या जागी पाहते. हे पाहून पारूला खूप मोठा धक्का बसतो कारण पारूला याची पूर्वकल्पना दिलेली नसते. तेव्हा प्रीतम जाऊन पारूला सगळी हकीगत सांगतो. तेव्हा त्यानंतर आदित्य ही पारूला प्लीज मला साथ दे. माझ्यावर विश्वास ठेव, असं सांगतो. तेव्हा पारू या लग्नाला तयार होते.
मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, हे ऍडशूटसाठीच लग्न अगदी थाटामाटात लागलेल असतं आणि सगळं काही ओके झालेलं असतं. त्यानंतर पारूकडून दागिने वगैरे काढून घेतात तेव्हा पारू गळ्यातील मंगळसूत्र काढायला नकार देते. आता हे ऍड शूटसाठी केलेले लग्न मालिकेत कोणतं वळण घेणार हे पाहणं रंजक ठरेल.