‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, मारुती पारूला खूप ओरडत असतो कारण तिला बंगल्या बाहेर जाऊ नको असे खडसावून सांगितलेले असते. तरीसुद्धा पारू मारुतीला न विचारता आदित्य बरोबर बंगल्याबाहेर जाते तितक्यात आदित्य तिथे येतो आणि मारुतीची समजूत काढतो आणि सांगतो की, तिने माझा आदेश पाळला आहे त्यात पारूची काही चूक नाही आहे. यानंतर मारुती पारुला समजावून सांगतो आणि घरातही घेतो. मात्र पारुला इकडे फार वाईट वाटलेलं असतं की, आपण वडिलांचा शब्द पाळला नाही आहे. म्हणून ती रडत बाहेर बसलेली असते तेव्हा गणी तिच्या जवळ येतो आणि तिला सांगतो की तू रडू नकोस. चल आपण जेवून घेऊया. तू रडली त्याचं मला फार वाईट वाटतं आणि त्यानंतर तो दामिनीने त्याला मारलं याबद्दलही सांगतो. (Paaru Serial Update)
हे ऐकून पारूला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते की, त्यांची हिंमत कशी झाली तुला मारायची, मात्र यावर नंतर काहीच कोणी बोलत नाही. तर इकडे प्रीतम व आदित्य बोलत असतात तेव्हा आदित्य सांगतो की, मी आईला सगळं काही सांगितलं आहे यावर प्रीतम आदित्य वर रागावतो आणि सांगतो की तू सगळं आईला का सांगितलं?, मी सगळं मॅनेज केलं होतं ना. त्यानंतर आदित्य सांगतो की, मी आईशी जास्त वेळ खोटं बोलू शकत नाही आता त्या ऍड शूटच्या लग्नाचं ही सत्य मला लवकरच आईला सांगायचं आहे. तितक्यातच इकडे सगळेजण बसलेले असतात तेव्हा दिशा अहिल्यादेवीना ऍडशूटची लिंक पाठवते आणि त्यांना बघायला सांगते.
अहिल्यादेवी ती लिंक पाहतात मात्र तो व्हिडिओ इंटरनेटवरून काढून टाकलेला असतो त्या वेळेला प्रीतम आणि आदित्यला खाली बोलावून घेतात आणि हरीशलाही बोलावतात. प्रीतम आणि आदित्यला सांगतात की मी तुमच्या ऍड शूटच्या लग्नाचा व्हिडीओ बघत आहे असं म्हणून त्या त्यांच्याकडे बघतात दोघांनाही खूप घाम सुटलेला असतो. आता आईला हे सत्य समजलं असेल असं त्यांना वाटतं मात्र त्या म्हणतात की, हा व्हिडीओ तर इंटरनेटवरून काढून टाकला आहे. इतका मोठा निर्णय घेण्याआधी तुम्हाला मला विचारावं वाटलं नाही का?, हे ऐकल्यावर दोघांनाही खूप दिलासा मिळतो आणि सांगतात की कदाचित हे एक्सक्लूजीव लग्न होतं म्हणून त्यांनी इंटरनेटवरून काढून टाकला असेल आणि याची कॉपी ते आपल्याला मेलही करणार आहेत. हे ऐकल्यावर दिशा आणि दामिनीचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. तर इकडे त्याच्या आधीच पारू अहिल्यादेवी समोर येऊन काल घडलेल्या प्रकाराची माफी सुद्धा मागते आणि अहिल्यादेवी तिला माफही करतात आणि तिला जायला सांगतात.
आणखी वाचा – ‘सैराट’मधील लंगड्या अजूनही करतो शेती, गावाकडे गुरांना चरायलाही घेऊन जातो अन्…; पाहा फोटो
तर इकडे पारू वटपौर्णिमेसाठी तयारी करायचं ठरवते. माझं आता लग्न झालं आहे त्यामुळे मला हा उपवास धरावा लागेल आणि माझ्या पतीसाठी माझ्या पतीच्या आयुष्यासाठी मला ही पूजा करावीच लागेल, असं म्हणते. आता पारू वटपौर्णिमेची पूजा आदित्यसाठी करणार का?, आणि हे सत्य सगळ्यांसमोर येणार का? हे पाहणं मालिकेच्या आगामी भागात रंजक ठरेल.