‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळतं आहे की, अहिल्यादेवी समोर जाहिरातीचे सत्य अखेर आलेलं असतं. अवॉर्ड फंक्शनमध्ये कोणताच तमाशा नको म्हणून त्या त्या वेळेला काहीच बोलत नाहीत मात्र त्यांचा प्रचंड राग अनावर झालेला असतो. त्यानंतर त्या पारू व आदित्यला ट्रॉफी देतात आणि तिथून ताडकन निघून जातात. किर्लोस्कर बंगल्यात जेव्हा त्या पोहोचतात तेव्हा तुफान पाऊस सुरु असतो. त्या पावसातच त्या बाहेर जाऊन उभ्या राहतात आणि गार्डनमध्ये बसतात श्रीकांतही त्यांच्याबरोबर बसतो. श्रीकांत त्यांना समजवायचा प्रयत्न करतो मात्र त्या काहीच समजून घेत नाहीत आणि त्या सांगतात की, मी थोडावेळ इथेच बसते नंतर आत येते. (Paaru Serial Update)
तर इकडे दिशा व दामिनी हा खेळ पाहत मज्जा घेत असतात. तेव्हा दिशा म्हणते की, आता मी नवीन ड्रामाच करते. तितक्यात श्रीकांत अहिल्यादेवींची समजूत काढून त्यांना घरी आणत असतात तेव्हा दिशा मुद्दाम पुढे पुढे करत अहिल्यादेवींना काही झालं तर नाही ना म्हणून काळजी घेते. घरात येताना आदित्य ही तिथे पोहोचतात. तेव्हा आदित्य अहिल्यादेवींच्या अंगावर शाल टाकायला जातो तेव्हा अहिल्यादेवी ती शाल उडवून देतात आणि आदित्यच्या सणसणीत कानाखाली मारतात आणि सांगतात की, तू जेव्हा मॉडेल म्हणून उभे राहण्याचा निर्णय घेतलास तेव्हाच तुझं आणि माझं नातं संपलं.
एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस?, तुला मला हे एकदाही सांगावसं वाटलं नाही का?, यावर मध्ये-मध्ये दिशा आगीत तेल ओतण्याचं काम करत असते. पारुलाही दिशा भरपूर बोलते तर मारुती सांगतो की, यात माझी काही चुकी नाहीये मला यातलं काहीच माहिती नव्हतं. त्यानंतर अहिल्यादेवी पारूलाही म्हणतात की, तू मला देवी आई म्हणतेस ना मग तू इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून कशी लपवलीस?, मग इतके दिवस तू आमच्यासाठी जे काही केलं ते सगळं नाटक होतं का?, असा सवाल करतात.
तर आदित्यलाही त्या खडे बोल सुनावतात आणि सांगतात की, एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तुला मला एकदाही विचारावस वाटलं नाही का आणि इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवली कशी?, त्यानंतर त्या श्रीकांतला म्हणतात की, याच्यावर मी कसा विश्वास ठेवू हे तूच मला सांग, असं म्हणत त्या प्रचंड चिडतात. आता मालिकेच्या पुढील भागात अहिल्यादेवी या सगळ्यावर काय निर्णय घेणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.