‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेला प्रेक्षक उदंड प्रतिसाद देताना दिसत आहेत. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. मालिकेचं कथानक गावाकडच्या पारूभोवती फिरणार आहे. तर अहिल्यादेवी यांचा करारी स्वभाव साऱ्यांना विशेष भावतोय. मालिकेत पारूचा अहिल्यादेवींवरील विश्वास साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. इतकंच नव्हे तर आदित्य, प्रीतम यांनाही पाहणं रंजक ठरतंय. सध्या मालिकेचं कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. (Paaru Serial Update)
मालिकेत पारू व आदित्य यांच्यातील मैत्री पाहणं रंजक ठरत आहे. आदित्य नेहमीच पारूच्या संकटावेळी धावून येताना दिसला. तर पारूही आदित्यला गरज असताना त्याच्या मदतीला धावून आली. पारू-आदित्य यांच्यात मैत्री जपताना प्रेमाचे एकमेकांना देणारे संकेतही पाहायला मिळाले. पारूच आदित्यजवळ जाणं हे काही दिशा-दामिनीला पटत नाही. त्यामुळे दिशा पारूचा काटा काढायचा निर्णय घेते. पारू आदित्यचं नव्हे तर किर्लोस्कर घरातच पुढे पुढे करते म्हणून दिशा पारूला धडा शिकवते.
मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, पारूने हरिशबरोबर लग्नाला होकार दिलेला असतो. त्यामुळे पारू व हरीशच्या साखरपुड्याची जय्यत तयारी सुरु असते. तेव्हा आदित्य मिटिंग पुढे ढकलून पारूच्या साखरपुडयासाठी तयारी करू लागतो. अहिल्यादेवी व दिशा मिटिंगसाठी जात असतात तेव्हा आदित्य दरवाजावर सजावट करत असतो. तेव्हा दिशा हीच संधी साधत अहिल्यादेवींनी भडकावते.
किर्लोस्कर कंपनीचा सीईओ एका मेडच्या साखरपुड्याची अशी तयारी करतोय हे जर मीडियाला कळालं तर काय होईल. म्हणजे हे किती चुकीच दिसेल असं दिशा मुद्दाम अहिल्यादेवींसमोर बोलते. यावर अहिल्यादेवी थोडा विचार करतात आणि त्यांनाही हे थोडंसं पटतं. त्यानंतर ते आदित्यला बोलावून घेतात आणि आदित्यची चांगलीच कान उघडणी करतात. शिवाय एकीकडे दिशाने वखरवाडीला आदित्यला सोहळ नेसवतानाचे फोटो काढून ते अहिल्यादेवींनी दाखवून त्यांच्या मनात पारूविषयी राग निर्माण केलेला असतो. आणि म्हणून अहिल्यादेवी या गैरसमजापोटी पारूला हरीशबरोबर लग्न करण्याबाबत विचारतात. आता अहिल्यादेवींचा पारूबद्दलचा हा गैरसमज कोणतं वळण घेणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.