‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, आदित्य, प्रीतम, पारू यांच्यावर काही गुंडांनी रस्त्यात गाडी अडवून हल्ला केलेला असतो. आणि त्यांच्याकडून ते त्यांच्या खिशातील पैसे, अंगावरचे दागिने आहे ते सगळं काही काढून ठेवण्यास सांगतात. यावर सगळेजण त्यांच्याकडील मौलव्यान वस्तू काढून ठेवतात आणि तितक्यात त्या गुंडांची नजर पारूच्या कानातल्यांवर जाते आणि ते म्हणतात, ते तुझ्या कानातले पण पोरी काढून ठेव. यावर पारू म्हणते, नाही नाही ही माझ्या आईची शेवटची आठवण आहे त्याच्यामुळे मी हे असं करणार नाही. (Paaru Serial Update)
तितक्यात ते गुंड आदित्यकडे धावत जातात. आता हे तर कानातले आम्हाला हवेच आहेत असं म्हणत तो गुंड पारु जवळ धावत येत असतानाच आदित्यचा राग अनावर होतो आणि आदित्य त्या गुंडाला पकडून मारतो. तितक्यात तो प्रीतमला आवाज देतो आणि प्रीतम ही खाली येऊन त्या गुंडांना मारू लागतो. प्रीतम व आदित्य दोघेही त्या गुंडांना बेदम मारतात आणि त्यानंतर ते गुंड तिथून पळून जातात. आदित्य, पारू, दिशा, प्रीतमने काढून ठेवलेल्या मौल्यवान वस्तू प्रीतम जमा करतो आणि गाडीत बसतो आणि आदित्य गाडी घेऊन निघून जातो. त्यानंतर ते अखेर वाखरवाडीला पोहोचतात. तर इकडे अहिल्यादेवींना काळजी लागून राहिलेली असते की, मुलांचा फोन का लागत नाही आहे. म्हणून त्या सतत फोन करत असतात. मात्र एकदा फोन लागतो तेव्हा प्रीतम सगळं काही ठीक असल्याचे सांगतो.
आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन; व्यासपीठावरच घेतला अखेरचा श्वास
अहिल्यादेवी देवघरात पूजा करायला येतात तेव्हा देवघरात सगळं काही अस्थावस्था पडलेलं असतं आणि देवाला घालायला फुले नसतात. कारण पारू नसते. शिवाय देवाचा नैवेद्यही उशिरा झालेला असतो कारण पारू नसते. त्यावेळेला आरती करताना आगीच्या झोताने अहिल्यादेवींचा हातही भासतो अहिल्यादेवी शेवटी म्हणतात, आज मनासारखी पूजा झाली नाही तर इकडे वाखरवाडीला पोहोचल्यानंतर सगळेचजण खूप खुश असतात. एक आजीबाई गूळ पाणी देऊन त्यांचं स्वागत करते. तर हरीशच्या व्यवस्थेनुसार गावकरी सगळे जमलेले असतात. तेव्हा हरीश सांगतो की, आता आपल्याला जायला लागेल. तेव्हा दिशा पारुला म्हणते की, तू या अवतारात जाणार आहेस का?, तू एका कंपनीची ब्रँड अँबेसिडर आहेस असं म्हणत तिला याची जाणीव करून देते. त्यावर आदित्य व प्रीतम ही काही बोलत नाहीत. त्यानंतर पारू तयार व्हायला हरीशने दाखवलेल्या मेकअप रूममध्ये निघून जाते. तर अहिल्यादेवी व श्रीकांत बोलत असतात तेव्हा त्यांना जुन्या आठवणींची आठवण येते आणि मुलांची खूप आठवण येत असते. तेव्हा श्रीकांत म्हणतो की, तू संध्याकाळी काय करतेय, आपण पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देऊया का. आपण बाहेर फिरायला जाऊया.
यावर अहिल्यादेवी हो असं म्हणतात. तर इकडे अहिल्यादेवीचे लक्ष श्रीकांतने आजही गोळ्या घेतलेल्या नसतात याकडे जात आणि त्या श्रीकांतला ओरडू लागतात. तेव्हा ते म्हणतात की, पारू आज नाही आहे ना. नाहीतर ती मला माझ्या हातात आणून देते. हे ऐकल्यावर अहिल्यादेवींचा राग अनावर होतो. अहिल्यादेवी म्हणतात, सतत काय पारू पारू पारू आज देवघरात गेले तिथे फुलं नाहीत, नैवेद्य वेळेवर आला नाही कारण पारू नाही. तू गोळ्या घेतल्या नाहीस कारण पारू नाही हे घर माझं आहे की पारूचं?, यावर श्रीकांत हसत हसत म्हणतो की, हे घर तुझ आहे पण हे घर सवरतेय पारू. आता मालिकेत पारूच्या नसण्याने अहिल्यादेवींचा काही गैरसमज तर होणार नाही ना?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.