मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत खलनायकाची भूमिका साकारत अभिनेते अनंत जोग यांनी लोकप्रियता मिळवली. खलनायक म्हणून ओळख मिळवत अनंत जोग यांनी सिनेसृष्टीत आपली जागा निर्माण केली. गेल्या अनेक वर्षांपासून अनंत जोग सिनेसृष्टीत कार्यरत असून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. व्यावसायिक आयुष्याशिवाय ते वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. मात्र ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत फार कमीवेळा बोलताना दिसतात. (Anant Jog On Ujjwala Jog)
जोग कुटुंब हे सिनेसृष्टीत कार्यरत आहे. अनंत जोग यांची बायको अभिनेत्री उज्ज्वला जोग आणि त्याची लेक क्षिती जोग हे सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. क्षितीने ही सिनेसृष्टीत स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. सध्या अनंत जोग यांची लेक क्षिती हिने सध्या निर्मितीक्षेत्रातही उडी घेतली आहे. तर क्षिती अठरा वर्षांची असतानाच अनंत जोग व उज्ज्वला जोग यांनी घटस्फोट घेतला आणि ते वेगळे झाले. सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या युट्युब चॅनेलला अनंत जोग यांनी मुलाखत दिली.
या मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांच्या पत्नीबाबरोबर असलेल्या नात्याबाबत भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “जरी आमचा घटस्फोट झाला असला तरीही आमचं नातं हे मैत्रीपूर्व आहे. तिने कधी बोंबलाचं कालवण केलं की ती मला फोन करुन जेवायला बोलवते. कधी मला बोंबलाचं कालवण खावं वाटलं की, मी तिला फोन करुन सांगतो. आणि त्यावेळी बाजारात जर बोंबील मिळाले तर ती नक्की करते. पण आजही आम्ही फोनवर बोलतो. कधी-कधी भेटायला जातो”.
तसेच अनंत जोग यांनी लेक क्षितीबाबतही यावेळी भाष्य केलं. क्षितीबाबत बोलताना ते म्हणाले, “तिने मला तिच्या दोन तीन सिनेमात कामही दिलं, पण त्याचे पैसे नाही दिले, मग काय उपयोग. मुलगी असली म्हणून काय झालं, मला दोन वेळेला जेवायला लागतचं की, असा मिश्किल अनुभव त्यांनी यावेळी सांगितला.