दिग्दर्शक, निर्मात्यांनी शिव्या दिल्या, हाकललं पण आज मानानं घेतलं जात नाव..

Struggle Story of Manoj Bajpayee
Struggle Story of Manoj Bajpayee

‘क्या हार मे क्या जीत मे, किंचित नहीं भयभीत मे’ या अटल बिहारी वाजपेयी यांनी लिहिलेल्या ओळी लागू पडतात ते अभिनेते मनोज बाजपेयी यांच्यासाठी. कलाकार कितीही प्रसिद्ध झाला तरीही एक गोष्ट तो कधीच विसरत नाही ती म्हणजे त्याच्या आयुष्यात त्याने उपभोगलेला स्ट्रगल. अगदी आज कितीही मानधन घेत असले, कितीही चित्रपट, मालिका गाजवलेले बहुगुणी कलाकार असले तरीही त्यांच्या प्रवासातील ही मेहनतीची आठवण असलेली शिदोरी कायम त्यांना प्रोत्साहित करत असते. स्ट्रगल स्टोरी या इट्स मज्जाच्या स्पेशल भागात आज थोडक्यात जाणून घेऊयात लोकप्रिय अभिनेते मनोज वाजपेयी यांच्या आयुष्यतील स्ट्रगल बद्दल.(Struggle Story of Manoj Bajpayee)

१९९८ मध्ये प्रदर्शित झालेला राम गोपाल वर्मा यांचा सत्या चित्रपट तुम्हाला माहितीचं असेल.या चित्रपटातील भिकू म्हात्रे ही भूमिका चांगलीच गाजली आणि ही भूमिका साकारली होती गावाकडून शहरात काम मिळवण्यासाठी आलेले आणि आज या मनोरंजनविश्वात एक मानाचं स्थान मिळवलेले अभिनेते मनोज बाजपेयी. मनोज बाजपेयी हे नाव आज जितक्या अभिमानानं घेतलं जात त्या मागे असणारी गोष्ट देखील तितकीच खुमासदार आहे.

१० किलोमीटर चालत जायचो कारण…


ऐका मुलाखतीत त्यांनी त्याच्या या प्रवासाबद्दल सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं एक काळ असा होता ज्यावेळी त्यांना आज खायला भेटलं तर उद्या काय करायचं काय खायचं याची काही कल्पना नसायची, कित्येकदा नाटकाच्या ठिकाणी जाण्यासाठी कोणतंही वाहन नसायचं त्यावेळी १० १० किलोमीटर पर्यंतचा प्रवास पायी करून जावं लागायचं पण तेव्हा ही त्यांच्यामानात आपल्याला उद्या कोणता सीन करण्याचा आहे, नाटकात आपले सवांद काय आहेत याच गोष्टी असायच्या. पायी चालत जात असताना ते इंग्रजी सुधारावं या साठी ती वाक्य बोलत जायचे आणि त्यामुळे कधी कधी लोक कोण वेडा चाललंय असं देखील त्यांना म्हणायचे.

अनेक प्रोडक्शन हाऊस मधून हाकललं…(Struggle Story of Manoj Bajpayee)

पुढे सांगताना मनोज म्हणाले कि सुरुवातीला काम मागायला गेलो कि अनेक प्रोडक्शन हाऊस मधून आम्हाला हाकललं गेलं. कामासाठी खूप भटकायचो. अनेक निर्माते, दिगदर्शक सुद्धा शिव्या देऊन आम्हला हाकलून द्याचे. इतका अपमान होऊन ही कधी काम करण्याची इच्छा संपली नाही असं देखील मनोज जी मुलाखतीत म्हणाले. सुरुवातीला अनेक ठिकाणी छोटा मोठं काम करून मी काम करत गेलो स्वतःला सिद्ध करत गेलो आणि अशी काम करत करतच मला बॅन्डेट queen हा चित्रपट मला मिळाला असं मनोज म्हणाले.

५ वर्षांनी मिळाला ‘ भिकू म्हात्रे….’

सत्या हा चित्रपट गाजण्यामागे आणखी एक कारण होत ते म्हणजे या चित्रपटात मनोज वाजपेयी यांनी साकारलेली भिकू म्हात्रे ही भूमिका. परेश रावल यांच्या एका चित्रपटात सहाय्यकाची भूमिका म्हणून मनोज यांना रोल मिळाला होता त्या निम्मित मनोज आणि राम गोपाल वर्मा यांची भेट झाली आणि जेव्हा राम गोपाल वर्मा यांना समजलं कि सत्या मध्ये काम केलेला करालंकार हाच आहे तेव्हा ते उठून उभे राहिले आणि त्यांनी मनोज यांना विचारलं कुठे होता तू गेले पाच वर्ष मी तुला शोधतोय आणि त्यांनी सत्या मधील या भूमिकेसाठी मला निवडलं .

अनेक चित्रपटांमधून तसेच फॅमिली मॅन, गँग्स ऑफ वास्सेपूर अशा अनेक लोकप्रिय वेब सिरीज मधून मनोज यांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Queen of 80s faced worst things
Read More

शूटिंगदरम्यान जबरदस्ती केल्याने ‘या’ अभिनेत्रीने ठोकला सिनेविश्वाला रामराम

या घटनेनंतर अचानक अर्चना रुपेरी पडद्यावरून गायब झाली. करियरच्या टर्निंग पॉइंटवर असतानाच अर्चनाने लग्नाचा निर्णय घेतला आणि ती थेट अमेरिकेत स्थायिक झाली.
Mahesh Kothare Nilima Kothare
Read More

“खबरदार पुन्हा असं काही बोलशील तर!” महेश कोठारेंना दिली पत्नीने धमकी

पहिली माझी आई जेनमा आणि दुसरी माझी पत्नी नीलिमा! नीलिमा यांनी पत्नी म्हणून महेश यांची प्रत्येक काळात साथ दिली.
Dattu More Wedding News
Read More

‘म्हणून दत्तूने खाल्ला समीरचा ओरडा’ पाहा दत्तू ने लग्नाची बातमी सांगितल्यावर काय होत्या हास्य जत्रेतील मित्रांच्या रिअक्शन

अनेक कलाकार नेहमी चर्चेत असतात त्यांच्या आयुष्यातील कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे. सध्या असाच एक चर्चेचा विषय आहे तो…
Ashok saraf Sulochana Latkar
Read More

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी केले सुलोचना लाटकर कुटुंबियांचे सांत्वन

सुलोचना लाटकर यांच्या अंत्यदर्शनाला अभिनेते सचिन पिळगांकर, अशोक सराफ, निवेदिता सराफ तसेच राजकीय क्षेत्रातून मनसे अध्यक्ष
Dattu Mores Honeymoon
Read More

पहा दत्तू मोरे चाललाय या ठिकाणी हनिमूनला

लग्न संभारंभ, प्री वेडिंग फोटोशूट उरकल्यानंतर आता दत्तू त्याच्या बायकोला घेऊन कुठे हनिमूनला जाणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.