टेलिव्हिजनवर २००२ साली सुरु झालेली ‘क्योकी सास भी कभी बहु थी’ ही मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेतील तुलसी ही भूमिका सगळ्यांची लोकप्रिय भूमिका होती. ही भूमिका अभिनेत्री स्मृती इराणी यांनी साकारली आहे. या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. विशेषतः महिलांमध्ये ही भूमिका अतिशय गाजली होती. सालस सून व घराची काळजी घेणारी सून कशी असावी यासाठी मालिकेतील तुलसीचे उदाहरण दिले जात असे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माती एकता कपूरने या मालिकेची निर्मिती केली होती. फार पूर्वीपासूनच एकता व स्मृती यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. पण स्मृती यांना ही भूमिका कशी मिळाली याबद्दल यांनी स्वतः खुलासा केला आहे. (smirti irani on kyonki saas bhi kabhi bahu thi)
‘क्योकी सास…’ या मालिकेतील तुलसीची भूमिका कशी मिळाली हे स्वतः स्मृती यांनी सांगितलं आहे. सुरुवातीपासूनच दोघींचे मैत्रीपूर्ण संबंध होते. पण ही भूमिका मिळण्यामागे जोतिषांचा हात होता हे त्यांनी सांगितले. याबद्दल त्या म्हणाल्या की, “माझ्या दिसण्यामुळे किंवा माझ्या व्यक्तीमत्त्वामुळे मला ही मालिका मिळाली नव्हती. एकताने एकदा तिच्या ऑफिसमध्ये ज्योतिषांना बोलावले होते. त्यांनी मला लांबूनच पाहिले आणि थांबण्यास सांगितले. त्यांनी मला तिथे सांगितले की मी मोठी स्टार होणार आहे”.
पुढे त्यांनी सांगितले की, “मी एकदा कॉन्ट्रॅक्ट सही करण्यासाठी गेले होते ज्यामध्ये मला बहिणीची भूमिका मिळणार होती. तिथे एकता एका पंडितांबरोबर बसली होती. त्यांनी एकताला सांगितले की जर तिने माझ्याबरोबर काम केले तर देशाचा एक मोठा चेहरा होणार आहे. तसेच त्यांनी त्यांचे वाक्य संपवले एकताने लगेचच माझ्याकडे आली आणि मला विचारले की कशावर सही करत आहेस? तिने नंतर मला तिच्या मालिकेत काम करण्याची ऑफर दिली. मी ती लगेच स्वीकारली आणि नंतर तुलसी म्हणून सगळ्यांच्या समोर आले”.
तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. एकताने हा व्हिडीओ रिशेअर करत लिहिले की, “हे खरं नाही आहे. मोनिषाने तुमची ऑडिशन घेतली होती. आम्ही ती पहिली आणि मग तुमची निवड केली”.
दरम्यान एकताच्या या प्रतिक्रियेमुळे मनोरंजन क्षेत्रांमध्ये खूप चर्चा सुरु झाली. स्मृती इराणी सध्या अभिनयापासून दूर असून राजकारणामध्ये सक्रिय आहेत. त्या आता महिला व बालकल्याण विकास मंत्री म्हणून कार्यरत आहेत.