Koi Mil Gaya Re release : बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनचा २००३ झाली प्रदर्शित झालेला ‘कोई मिल गया’ हा भारतातील पहिला सुपरहिरो चित्रपट होता. येत्या ८ ऑगस्टला या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण होणार असून त्यानिमित्ताने प्रेक्षकांना हा चित्रपट पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. (Koi Mil Gaya Re release)
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार अशी माहिती मिळतंय की, PVR आयनॉक्स ही मल्टिफ्लेक्स कंपनी राकेश रोशन दिग्दर्शित ‘कोई मिल गया’ चित्रपट ४ ऑगस्टपासून देशभरातील ३० शहरांमध्ये पुन्हा प्रदर्शित करणार आहे. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हणाले, की हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यासाठी पीव्हीआर आयनॉक्सच्या टीमने आमच्याशी संपर्क साधला होता. त्यांच्या कल्पनेला मीही लगेच सहमती दर्शवली.”
पुढे चित्रपटाच्या निर्मितीबद्दल बोलताना राकेश रोशन म्हणाले, “‘कोई मिल गया’ चित्रपट आम्हाला लहान मुलांसाठी बनवायचा होता. मात्र ज्याचा आनंद लहान मुले आणि त्यांची कुटुंबीय दोघेही घेऊ शकतात. एलियन्सवर सायन्स फिक्शन फिल्म बनवणं हा चित्रपट निर्माता म्हणून मी घेतलेला जोखमीचा निर्णय होता. पण त्या चित्रपटाला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार होता. त्यामुळेच मला अश्या पद्धतीचे चित्रपट बनवण्याचा आणि प्रयोगशील असण्याचा माझा विश्वास दृढ झाला.”
हे देखील वाचा – विमानतळावर मुद्दाम सेलिब्रिटींची अधिक तपासणी करतात समीर वानखेडे? म्हणाले, “एअरपोर्टवर असताना…”
हे देखील वाचा – सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा अजब कारभार, लाखो रुपयांना विकलं नकली ब्रॅण्डचं घड्याळ, गुन्हा दाखल
८ ऑगस्ट २००३ रोजी ‘कोई मिल गया’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो प्रेक्षकांना प्रचंड आवडला. चित्रपटाची कथा रोहित या पात्राभोवती फिरत असून ज्यात त्याच्या आयुष्यात ‘जादू’ नावाचा एलियन येतो. चित्रपटात हृतिकसह प्रीती झिंटा, रेखा, रजत बेदी, प्रेम चोप्रा आणि हंसिका मोटवानी आदी मुख्य भूमिकेत होते. पुढे याच कथेच्या पात्रांवर ‘क्रिश’ आणि ‘क्रिश ३’ हे चित्रपट बनले असून लवकरच याचा पुढचा भाग ‘क्रिश ४’ ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Koi Mil Gaya Re release)