लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला कायमच चर्चेचा विषय असतो. काहीजण त्यांच्या लग्नाबाबत कायमच उदासीन असतात तर काही जण त्यांच्या लग्नासाठी कायमच उत्सुक असतात. त्यात लग्न हे एका प्रसिद्ध व्यक्तीचं असेल तर त्यांच्या लग्नासाठी त्यांच्यासह त्यांचे अनेक चाहतेमंडळीदेखील उत्सुक असतात. मनोरंजन सृष्टीतदेखील असे अनेक कलाकार आहेत, जे त्यांच्या लग्नासाठी आतुर आहेत. अशीच लग्नासाठी उत्सुक असलेली एक अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. (Jui Gadkari On Her Marriage)
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत अद्वैत व कला यांच्या लग्नानिमित्त स्टार प्रवाहवरील इतर मालिकांच्या कलाकारांनी देखील हजेरी लावली. यावेळी ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली अर्थात जुईही या लग्नाला उपस्थित होती. यावेळी जुईने तिच्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. जुई तिच्या लग्नासाठी लहानपणापासूनच उत्सुक असल्याचे ती यावेळी बोलली.
अभिनेत्रीने ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दलची उत्सुकता व्यक्त केली. यावेळी जुईला तिच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाबद्दल विचारले असता जुईने उत्तर देत असे म्हटले की. “लहानपणापासून मला लग्न करायची हौस होती. पण आता खूपच उशीर होत आहे. मी लग्नाचा खूप आधीपासून विचार केला आहे. पण सगळं काही त्याच्या (देवाच्या) हातात आहे. योग जुळून आले की सगळं काही होणार”.
त्याचबरोबर यापुढे जुईने तिच्या स्वत:च्या लग्नाबाबत असं म्हटलं की, “माझ्या लग्नातील लुक हा अत्यंत पारंपरिक असून मी अगदी साध्या पद्धतीने लग्न करणार आहे. मला उगाच भपकेदार लग्न आवडत नाहीत. हल्ली लग्नाचे ज्याप्रकारे इवेंट्स केले जातात. ते मला अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे अगदी साध्या, सोप्या व पारंपरिक पद्धतीने लग्न करणार आहे”.
दरम्यान, जुई ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. या मालिकेतील तिची भूमिका चाहत्यांना भलतीच आवडते. त्यामुळे या मालिकेत तिच्या सीनसाठी चाहतेमंडळी चांगलेच उत्सुक आहेत. तसेच ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ अद्वैत व नयना यांच्या लग्नात येणाऱ्या एका ट्विस्टमुळे त्या दोघांचे लग्न न होता अद्वैत व कलाचे लग्न पार पडणार आहे. त्यामुळे या लग्नात आणखी काय नवीन ट्विस्ट येणार यासाठी चाहते उत्सुक आहेत.