सध्याच्या काही ट्रेंडिंग गाण्यांपैकी चांगलंच गाजत असलेलं गाणं म्हणजे गुलाबी साडी, या गाण्याने अक्षरश; भारतातच नव्हे तर भारताबाहेरही आपला प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. ‘गुलाबी साडी’ या गाण्याने अगदी बॉलिवूडपासून ते मराठी मनोरंजन विश्वाला वेड लावले आहे. बॉलिवूडच्या धकधक गर्ल माधुरी दीक्षितपासून ते डान्सर रेमो डिसूझापर्यंत प्रत्येकाने या गाण्यावर ठेका धरला आहे.
एका गाण्यामुळे प्रसिद्धी झोतात आलेला हा संजू राठोड हा नेमका आहे तरी कोण असा प्रश्न त्याचया चाहत्यांना पडला आहे, नुकत्याच एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत संजूने या गण्यामागे त्याचा असलेला संघर्ष व मेहनत तसेच त्याच्या प्रवासाबद्दल सांगितले. संजू हा मुळचा जळगावचा राहणारा असून इंजिनीअरिंगचं शिक्षण घेताना त्याला त्याचया वडील आजोबांजकडून संगीताचं बाळकडू मिळालं असल्याचं त्याने यावेळी म्हटलं आहे.
तसेच या मुलाखतीत त्याने असं म्हटलं की, “माझ्या घरातच माझे वडिल व आजोबा भजन करायचे. रात्रीपासून पहाटेपर्यंत ते भजन करायचे आणि त्यांच्याबरोबर मी ते भजन ऐकत बसायचो. तिथूनच माझ्यात ते आलं असावं.” यापुढे त्याने त्याला पहिलं गाणं कसं सुचलं? असा प्रश्न विचारताच संजूने असं म्हटलं की, “माझं पहिलं ब्रेकअप झालं होतं, तेव्हा मला ते गाणं सूचलं. त्याला काही वेगळं कारण नाही. मी तेव्हा दु:खी झालो होतो. मग मी एक रॅप लिहिला. तेव्हा रॅप करता करता मी शोजदेखील केले.”
यापुढे संजूने त्याच्या साध्यासोप्या गाण्यांबद्दल असं म्हटलं की, “एका कार्यक्रमाला मी रॅप करता करता मी शोज देखील केले. त्या शोला मी माझ्या आईवडिलांना बोलवायचो. तेव्हा एकदा माझे पप्पा आले होते. पप्पांनी तो रॅप ऐकलं. तेव्हा मी त्यांना विचारलं की, “तुम्हाला रॅप आवडला का?.” यावर ते “तू काय लिहिलं आहेस?, हेच कळत नाही आहे”. त्यानंतर मला कळायला लागलं की, आपण असं काहीतरी करावं जे सगळ्यांना आवडेल.”
यापुढे त्याने त्याच्या पहिल्या गाण्याची आठवण सांगताना असं म्हटलं की, “’माझ्या आईने सांगितलं की, तू देवावर एखादं गाणं कर. मग मी ‘बाप्पावाला गाना’ हे गाणं लिहिलं. तेही लोकांना खूप आवडलं. पण रितेश देशमुख सरांनी त्यावर रील केलं आणि ते गाणं खूपच व्हायरल झालं.” तसेच यापुढे त्याने “मी व्याज घेऊन गाणी करायचो आणि मग व्याजावर व्याज वाढत गेलं आणि खूप कर्ज झालं. माझ्याकडे भाडं भरायलाही पैसे नव्हते. मी युट्युबवरही चुकीचा पत्ता टाकल्याने त्याचे जे पैसे यायचे ते दुसऱ्या ठिकाणी जायचे. माझी दोन वर्ष त्यातच गेली” असं म्हटलं.