GharoGhari Matichya Chuli promo : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. तर सध्या या मालिकेत अनेक ट्विस्ट येताना पाहायला मिळतात. तसेच आता या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि ऋषिकेशच्या लग्नाची तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. ऐश्वर्याकडून आईचा पत्ता काढून घेण्यासाठी जानकी हृषिकेश-ऐश्वर्या यांच्या लग्नाला मान्यता देते. शिवाय ऐश्वर्या देखील कट कारस्थान करुन हृषिकेशबरोबर लग्न करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र आता यात एक रंजक वळण येताना पाहायला मिळालं आहे.
सारंगचा मृत्यू झाला आहे असा प्लॅन जानकी व इतर घरातील सदस्य करतात. ऐश्वर्याला जाळ्यात अडकवण्यासाठी हा डाव सगळ्यांनी एकत्र मिळून केलेला असतो. तर नुकताच या मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला, ज्यात ऐश्वर्या व हृषिकेश यांच्या लग्नाच्या वेळी जानकी सारंगला तिच्यासमोर घेऊन येते आणि तिचं हृषिकेशबरोबर लग्न करण्याचा डाव उधळून लावते.
आणखी वाचा – सूरज चव्हाण चढणार बोहोल्यावर, कोकणहार्टेड गर्लने शेअर केला पत्नीबरोबरचा फोटो, लवकरच…
समोर आलेल्या प्रोमोमध्ये ऐश्वर्या आणि हृषिकेश लग्नासाठी उभे असतात. मी हृषिकेशची बायको असं ऐश्वर्या मनात म्हणताना दिसते. त्यानंतर अंतरपाट काढल्यानंतर ऐश्वर्या समोर सारंग उभा असलेला दिसतो. तेवढ्यात जानकी, “घाबरू नको सारंग भावोजी फक्त तुला नाही तर आम्हा सगळ्यांना दिसतायत”, असं तिला म्हणते. तर पुढे हृषिकेश म्हणतो, “कारण सारंग जिवंत आहे”. त्यानंतर, “तू आमच्या कुटुंबाला तोडायला आली होतीस ना आता मी तुला तोडणार”, असं जानकी ऐश्वर्याला म्हणते. पुढे जानकी आणि ऐश्वर्या या दोघींमध्ये ही जबरदस्त भांडण होताना पाहायला मिळतं आहे.
हा वार माझ्या घरच्यांना तोडण्यासाठी आणि तुला अद्दल शिकवण्यासाठी, असं म्हणत जानकी ऐश्वर्याला घराबाहेर काढते. तर आता पुढे जानकी तिच्या आईचा शोध कसा घेणार आणि ऐश्वर्या आता कोणता नवीन डाव खेळणार तसेच याव्यतिरिक्त आणखी कोणते नवीन ट्विस्ट मालिकेत पाहायला मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.





