मराठी सिनेसृष्टीत नाटक, चित्रपट, मालिका यांसारख्या तीनही माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अभिनेते म्हणजे विजय गोखले. विजय गोखले यांनी आजवर त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. रंगमंचावरुन विजय यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तसेच मालिकाविश्वातूनही ते प्रेक्षकांच्या भेटीस आले. अभिनयाची उत्तम जाण असणाऱ्या विजय यांनी नुकतीच ‘झी नाट्य गौरव’मध्ये ‘नाटक किस्से व आठवणी’ या सेगमेंटमध्ये सहभागी झाले होते. यावेळी बोलताना विजय यांनी नाटकादरम्यानचा एक उत्तम अनुभव चाहत्यांसह शेअर केला. (Vijay Gokhale Incident)
विजय गोखले व निवेदिता सराफ अभिनीत ‘वाहतो दुर्वांची जोडी’ या नाटकाला भरभरून प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला. ‘वाहतो दुर्वांची जोडी’ या नाटकादरम्यानचा एक अनुभव विजय यांनी चाहत्यांसह शेअर केला. विजय गोखले म्हणाले, “या नाटकात बिगडलेल्या दोन मुलांची कथा दखवण्यात आली. या नाटकाचे अनेक प्रयोग झाले आणि अक्षरशः हजारो लोकांनी हे नाटकाचे प्रयोग पाहिले. कोकणात तरळा नावाचं गाव आहे. तिथे हा मी प्रयोग केला”.
पुढे म्हणाले , “ज्येष्ठ अभिनेते बाळ कोल्हटकर व अभिनेत्री आशाताई काळे हे दोन दिग्गज भूमिका करायचे त्यांच्यानंतर मी आणि निवेदिता सराफ या भूमिका केल्या. त्या दिवशी हा प्रयोग संपवून मी लॉजवर कणकवलीला गेलो. रात्रीच्या साडेतीन वाजता चव्हाण नावाचे गृहस्थ दोन मुलांना घेऊन आले. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना माझ्या पायावर घातलं. त्यांनी सांगितलं माझी दोन्ही मुलं बिघडलेली, वाईट मार्गाला लागलेली मुलं आहेत”.
यापुढे ते असंही म्हणाले की, “आजचा अभिनय, आजची ताकद, आजच नाटक पाहून आयुष्यभर आम्ही चांगले वागू असं देवासमोर उभं राहून वचन घेतलं, आणि असं वचन मला त्यांनी दिलं आहे. त्यावेळी मला एक गोष्ट कळली की, कला व समाज यांचा एकमेकांवर होणार परिणाम पाहायला मिळाला”.