Akshaye Khanna : आदित्य धरच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने देशातच नव्हे तर जगभरात खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाने परदेशातही बंपर कमाई केली. चित्रपटाच्या कथेचे आणि पात्रांचे सर्वत्र कौतुक होत असून अक्षय खन्ना सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय आहे. अक्षय खन्ना त्याच्या एका मुलाखतीत म्हणाला होता, “मला मुलांना जन्म देण्यात रस नाही. काही लोकांना मुलगा, बायको, कुटुंब असणं खूप आवडतं. मला कसलीही घाई नाही, माझ्या आयुष्यात असं काही असण्यात मला रसही नाही. एक कुटुंब आहे, मुलं आहेत या मला उत्तेजित करणाऱ्या गोष्टी नाहीत. माझी एकही महत्त्वाकांक्षा नाही. असे म्हणत तो स्वतःलाच विचारतो – हे विचित्र आहे का?”.
या चित्रपटात रहमान डाकू तसंच भावनिक बापाच्या भूमिकेत अभिनेता लोकांची मने जिंकत आहे. आता यामुळे अक्षय खन्नाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांची उत्सुकता पुन्हा एकदा जागृत झाली आहे. त्याचे काही जुने व्हिडीओ समोर आले आहेत ज्यात तो लग्न न करण्याबद्दल आणि वास्तविक जीवनात मुले होण्यात रस नसल्याबद्दल बोलत आहे. त्याने वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत लग्न का केले नाही यावर पुन्हा एकदा लोकांची उत्सुकता वाढली आहे.
आणखी वाचा – “छबील-गोदोची आई आली…”, क्रांती रेडकरची ओळख नेमकी कशी आहे?, स्वतःच म्हणाली, “वानखेडेंची बायको…”
अक्षय खन्नाचे नाव ऐश्वर्या राय आणि करिश्मा कपूर सारख्या स्टार्ससोबत जोडले गेले आहे. तर करिश्माचे वडील त्याच्या घरी मागणी घेऊन गेले होते, अशा बातम्याही आल्या होत्या. आता, अभिनेता इतकी वर्षे अविवाहित होता हे लोकांच्या समजण्यापलीकडचे आहे. मात्र, अभिनेत्याने याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे. तेव्हा अक्षय म्हणालेला, “मला माहित नाही, माझे असे स्वप्न नाही की एक दिवस मुलं होतील, ते बागेत खेळत असतील आणि मी बघेन आणि मी बागकाम करत असेल”.
कुटुंब, पत्नी आणि मुलांबाबत तो म्हणाला, “हे सर्व समाजाचे पूर्वनियोजित नियम आहेत की आयुष्य असे आहे. या वयात लग्न होते, या वयात नोकरी सुरु होते, या वयात निवृत्त होतात”. त्याला विचारण्यात आले की, आता कोणाच्या तरी प्रेमात पडावे, असे वाटत नाही का? यावर अभिनेता म्हणाला, “मी संपूर्ण जगाशी लग्न केले आहे”. एका मुलाखतीत त्यांनी असेही म्हटले होते की, “लोक तुम्हाला ओळखतही नाहीत आणि तुम्ही लग्न केव्हा करणार आहात हे विचारणे खूपच चिडखोर आहे”.





